साम्यवाद्यांनो, विश्‍वात साम्यवाद कुठेच नसतो, तर केवळ अद्वैतात असतो, हे लक्षात घ्या !

विश्‍वातील अनंत सजीव आणि निर्जीव गोष्टींच्या प्रत्येक गटात, उदा. माती, वनस्पती, प्राणी, मानव यांत अब्जावधी प्रकार आहेत. असे असतांना साम्यवाद हा शब्द हास्यास्पद ठरतो. साम्यवाद फक्त अद्वैतात असतो; कारण तेथे फक्त ब्रह्मच असते. असे असतांना साम्यवाद हा शब्द उच्चारणे, हे स्वतःला काही कळत नाही, याचे आणि इतरांना हा शब्द सांगणे, हे अज्ञान पसरवण्याचे लक्षण आहे. … Read more

हिंदु राष्ट्रात खर्‍या संतांनाच स्वतःला महाराज, स्वामी इत्यादी म्हणवून घेण्याचा अधिकार असेल !

हल्ली भोंदू महाराज, स्वामी इत्यादींचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्यांच्यामुळे खर्‍या संतांपर्यंत बहुतेक व्यक्ती पोहोचू शकत नाहीत. भोंदू महाराज आणि स्वामी यांचे पितळ काही काळाने उघड होते. असा अनुभव आला की, सर्वसाधारण जनतेचा खर्‍या संतांवरचाही विश्‍वास डळमळीत होतो. त्यामुळे त्यांचा साधना, अध्यात्म आदी विषयांवरचाही विश्‍वास उडतो. अशा व्यक्ती बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या जाळ्यात सापडतात आणि धर्मद्वेष्ट्या होतात. … Read more

उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही !

उपाय म्हणून औषधे घेतल्यास त्यांचा कधी दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ शकतो; पण उपाय म्हणून साधना केल्यास दुष्परिणाम कधीच होत नाही ! – डॉ. आठवले (१८.६.२०१४)

चेहरा हसरा ठेवायला शिका आणि स्वतःला आणि इतरांना आनंद द्या !

देवाचे गुण आपल्यात यावे; म्हणून साधक साधना करतात. देवाच्या इतर गुणांकडे त्यांचे लक्ष असते; पण त्याच्या तारक रूपात त्याचा चेहरा हसरा, आनंदी असतो, हे बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, मन आणि शरीर यांचे एकमेकांवर परिणाम होतात. मन गंभीर असेल, तर चेहरा गंभीर दिसतो. याउलट चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला, … Read more

कलेपेक्षा ज्ञान महत्त्वाचे !

कलाकाराने एखादी अप्रतीम कलाकृती कोणाला दाखवली, तर ती पहाणार्‍याला केवळ व्यक्तीगत सुख देते. ती पहाणार्‍याला काही शिकवू शकत नाही. याउलट एखाद्याला अध्यात्म विषयक काही सांगितले, तर त्याला आनंद मिळतो आणि ते ज्ञान इतरांना देऊन तो इतरांनाही आनंदी करू शकतो. याचा अर्थ हा की, कला व्यष्टी साधनेत साहाय्य करते, तर ज्ञान समष्टी साधनेसाठी उपयुक्त आहे. – … Read more

व्यक्ती आणि देव यांवरील प्रेम

१. व्यक्तीवरील प्रेम : शारीरिक आकर्षण हा साध्या प्रेमाचा पाया असतो. प्रेयसीविषयीचे किंवा प्रियकराविषयीचे प्रेम हे लैंगिक इच्छा किंवा लैंगिक उपजत बुद्धीपासून निर्माण होते आणि ते प्रत्येक जिवंत प्राण्यात आणि माणसात असते. १ अ. देवावरील प्रेम : देवाविषयी प्रेम केवळ माणसात असते. जे निर्माण करावे आणि वाढवावे लागते. २. व्यक्तीवरील प्रेम : पुरुषाचे स्त्रीविषयी आणि … Read more

दुःखे नष्ट करण्याचे अध्यात्म सोडून इतर उपाय निश्चितपणे परिणामकारक नसतात !

रोग औषधांनी बरे होऊ शकतात. वातावरण पालटण्याने मानसिक रोगांची तीव्रता अल्प होते. मंत्रांनी किंवा देवतांची पूजा केल्याने पिशाचांचे निवारण होऊ शकते; परंतु हे उपचार निश्चितपणे रोग किंवा दुःख निवारण करतीलच, अशी खात्री नसते. काही रोग असाध्य असतात. प्रारब्धामुळे होणारे रोग किंवा दुःखे उपाय करूनही नाहीसे करता येत नाहीत. सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तर सुखम् । – महाभारत, … Read more

अध्यात्माची श्रेष्ठता!

विज्ञानाचा अभ्यास केलेले अध्यात्मविषयक तत्त्वांचे विश्‍लेषण करू शकत नाहीत; पण अध्यात्माचा अभ्यास केलेले विज्ञानातील तत्त्वांचे अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विश्‍लेषण करू शकतात ! – डॉ. आठवले (१४.६.२०१४)

संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन

त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे ! : संचलनाला साथ देणाऱ्या संघाच्या तुतारीतून निघणाऱ्या आवाजाचे वर्णन करतांना सावधान साप्ताहिकाने म्हटले होते, ‘त्रयस्थाच्या हृदयात कौतुक, मित्रांच्या हृदयात अभिमान व शत्रूंच्या हृदयात भय उत्पन्न करणारा तो ध्वनी आहे. ती आशेची हाक आहे. तो पराक्रमाला हुंकार आहे. तो विजीगिषेचा … Read more

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

बकऱ्यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. वाघीण गरोदर होती. उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. तिचे पिल्लू त्या बकऱ्यांच्या कळपात वाढू लागले. बकऱ्यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले. बकऱ्या ‘बें बें करीत. तसेच तेही ‘बें बें’ करू लागले. हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. एक दिवस त्या बकऱ्यांच्या कळपावर एका वाघाने … Read more