सनातन प्रभातमध्ये दृश्य जगाबरोबर अदृश्य जगाबद्दलही माहिती देण्याचे कारण

‘सनातन प्रभातमध्ये दृश्य जगाबरोबर अदृश्य (सूक्ष्म) जगाबद्दलही माहिती देण्यात येते; कारण दृश्य जगातील घटनांसाठी अदृश्य जगातील घटना कारणीभूत असतात व ‘दृश्य जग सुखी करायचे असेल, तर अदृश्य जगातील घटनांबद्दल उपाय केले पाहिजेत’, याची जाणीव मानवाला व्हावी.’ – डॉ. आठवले (२६.५.२००७, दुपारी १२.०५ )

नामजपात वैखरी वाणीचा लाभ

आपण नेहमी बोलतो, त्या वाणीला वैखरी वाणी म्हणतात. साधनेत नामजप करतांना वैखरीतून मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणींत जप करत करत पुढे जायचे असते. हे साध्य करणे सुरुवातीला कठीण असते. तेव्हा वैखरी वाणीत जप करतांना जप ऐकू येत असल्यामुळे जपावर मन एकाग्र व्हायला साहाय्य होते. त्यामुळे पुढच्या वाणींतील जप करणे सुलभ होते. – डॉ. आठवले … Read more

भक्तीसाठी प्रल्हादाला आदर्श मानण्याचे कारण

नरसिंहाचे रूप पाहून कोणालाही भीती वाटेल आणि तो दूर पळेल; पण छोटा प्रल्हाद भक्त असल्यामुळे चराचरात श्रीविष्णुला पहात होता. त्यामुळे तो नरसिंहाला घाबरला नाही. यावरून लक्षात येते की, प्रल्हादासारखी भक्ती केली, तरच भगवंत आपल्यालाही वाचवील. – डॉ. आठवले (१७.२.२०१४)

ख्रिस्ती बायबल वाटतात; म्हणून श्रीमद्भगवद्गीता वाटणारे हिंदू !

ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी बायबल वाटतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून काही हिंदू श्रीमद्भगवद्गीता वाटतात आणि अभिमानाने सांगतात, आम्ही गीतेच्या सहस्र प्रती समाजात वाटल्या. त्यांना हे कळत नाही की, बायबलमध्ये मानसिक स्तरावरची थोडीफार शिकवण आहे, तर गीतेत अत्युच्च स्तरावरची आध्यात्मिक शिकवण आहे. ती केवळ अभ्यासू किंवा चांगले साधक यांनाच कळू शकते. बहुसंख्य हिंदूंना गीता कळत नसल्यामुळे ते तिला कपाटात … Read more

बहुतेक पुजार्‍यांकडून होणारी देवळातील देवाच्या मूर्तीची अतिपरिचयात् अवज्ञा ।

देवळांतील पुजारी तेथील मूर्तीच्या सहवासात वर्षानुवर्षे सातत्याने असल्यामुळे बहुतेकांच्यात यांत्रिकपणा येतो. अतिपरिचयात् अवज्ञा । म्हणजे अतिपरिचयामुळे अनादर होतो या सिद्धांतानुसार त्यांच्याकडून मूर्तीच्या संदर्भात असे होते. याउलट देवळात दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांचा क्षणभरच्या दर्शनानेही भाव जागृत होतो. पुजारी असल्याचा स्वतःला लाभ व्हावा; म्हणून त्यांंनी आई-वडिलांची सेवा वर्षानुवर्षे यांत्रिकपणे न करणार्‍या श्रावणाचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. श्रावण … Read more

हल्लीची हास्यास्पद शिक्षा पद्धत आणि सनातन संस्था सांगत असलेल्या साधना करण्याच्या शिक्षेचे महत्त्व

शिक्षा करण्याचा मूळ उद्देश असा असतो की, गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करण्यास धजावू नये. हल्लीच्या शिक्षा पद्धतीत हे अजिबात साध्य होत नाही. पुनः पुन्हा तेच तेच गुन्हे करून गुन्हेगार तुरूंगात जातात. एखाद्याला फाशी दिले, तरी त्याच्या मनातील गुन्हा करण्याचा संस्कार नष्ट होत नाही. तो पुढील जन्मात पुन्हा तसेच गुन्हे करतो. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभात मध्ये गुन्हेगार, … Read more

व्याकरण सोपे केले ! – व्याकरणाचे महत्त्व ज्ञात नसलेले समाजातील तथाकथित विद्वज्जन आणि सर्वपक्षीय राजकारणी !

मराठी भाषेचे लेखन सुलभ होण्याच्या दृष्टीने तिच्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मराठी भाषा कशी लिहावी, याविषयी १४ नियम सिद्ध केले. सुलभीकरणाच्या या प्रयत्नात महामंडळाने संस्कृतोद्भव मराठी भाषेच्या व्याकरणात संस्कृत व्याकरणाच्या विरुद्ध जातील, असे पालट केले, उदा. मूळ इकारान्त शब्द ईकारान्त केले, म्हणजे गणपतिचे गणपती केले. असे करणे म्हणजे वैद्यकीय शिक्षण कठीण वाटणार्‍यांसाठी … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, धर्माची अद्वितीयता लक्षात घ्या !

धर्म अनादी असून युगेयुगे टिकतो. पंथ आणि संप्रदाय शेकडो वर्षे टिकतात, तर मानसिक स्तरावरच्या हिंदुत्ववादी संघटना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे विचार ५० – ६० वर्षांतच मृतवत होतात. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)

कुटुंबात होतात, तशी भांडणे सनातनच्या आश्रमांत शेकडो साधक एकत्र रहात असूनही होत नाहीत !

एखाद्या कुटुंबात फक्त नवरा-बायको असले, तरी त्यांची आपसात भांडणे होतात. एकत्र कुटुंबात २० – २५ जण असले, तरी भांडणे होतात; मात्र सनातनच्या देवद आणि रामनाथी येथील आश्रमांत शेकडो साधक एकत्र रहात असूनही त्यांच्यात भांडणे होत नाहीत. यावरून साधनेचे महत्त्व लक्षात येते. – डॉ. आठवले (२०.२.२०१४)

मानवाचा एक क्रमांकाचा शत्रू म्हणजे विज्ञान, तर एकमेव तारक म्हणजे अध्यात्म !

१. ‘विज्ञान मानवाला सुखलोलूप बनवते आणि मायेत अधिकाधिक अडकवते, तर अध्यात्म सुखाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देते, म्हणजेच त्याची मायेपासून सुटका करते. २. विज्ञान बुद्धीचा अहंकार वाढवते, तर अध्यात्म बुद्धीलय आणि अहंलय करण्यासाठीची साधना शिकवते.’ – डॉ. आठवले (पौष शुक्ल पक्ष ९, कलियुग वर्ष ५११४ (२०.१.२०१३))