स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

पतीला पत्नीचे नियंत्रण नको आणि पत्नीला पतीचे नको. दोघांनाही स्वातंत्र्य हवे. विवाहामुळे, विशेषतः स्त्री-स्वातंत्र्यावर बंधने येतात; म्हणून आजची स्त्री बंधनमुक्त होऊ इच्छिते. तिला स्वातंत्र्य (?) हवे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. काही मर्यादा सांभाळाव्याच लागतील. व्यक्तिस्वातंत्र्य, अभिरुचीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ही केवळ स्वैराचाराची वेगळी नावे आहेत. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (स्त्री-धर्म – ६, नोंदणी विवाहाच्या निमित्ताने…, पृ. … Read more

अधर्म म्हणजे पुरोगामित्व !

नीती, प्रामाणिकपणा, अस्मिता वगैरेंचा लेशदेखील या युरोपियन गोर्‍यांत आढळायचा नाही. अधर्म हा धर्म झाला आहे. यालाच पुरोगामित्व म्हणतात. तीच प्रगती ! तीच आधुनिकता ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (आचारधर्म, पृ. ८.)

औद्योगिक संस्कृतीचा भस्मासूर

आज औद्योगिक संस्कृतीने भयंकर धुमाकूळ घातला आहे. यंत्रांची इतकी बेसुमार वाढ झालेली आहे की, ही यंत्रे बाजूला सारली नाहीत, तर तीच आपल्याला खाऊन टाकतील. Stop machines, otherwise they will stop you ! या औद्योगिक संस्कृतीने कसा धुमाकूळ घातला आहे पहा. संपूर्ण पृथ्वीच या कंपन्यांच्या मालकीची झाली आहे. कडुलिंबाचे, बासमती तांदुळाचे पेटंटच नव्हे, तर बौद्धिक स्वामित्व … Read more

पू. अप्पाकाका यांचे चिंतन !

निंदा-स्तुती दुसर्‍याचा स्वभाव आणि त्याची कर्मे यांची निंदा करू नये. जो सर्व भूतांमध्ये परमेश्‍वर पहातो, तो कोणाचीही निंदा करूच शकत नाही. जेथून आपल्याला अपाय, धोका होण्याचा संभव वाटतो, तेथे भगवत्भाव ठेवावा, म्हणजे अपाय, धोका घालवण्याचा तो उपाय होऊन जातो. – (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)

दया म्हणजे दुसऱ्याच्या जीवनाचे मूल्य समजणे

आपल्या आतील परमात्म्याला पहाणे हे ज्ञान आहे. दुसऱ्यांमध्ये परमात्मा आहे हे न विसरणे, म्हणजे करुणा, दया. घराचा आश्रम किंवा आश्रमाचे घर होणे घरात राहूनही तुम्ही कोणाला उद्विग्न करत नसाल, तर तुमचे घर आश्रमच आहे. वाल्मीकींच्या आश्रमात जाऊनही तुमचे मन उद्विग्न होत असेल, तर तुम्ही वाल्मीकींना ओळखले नाही. – डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची हानी कशी होते, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल. १. व्यक्तीस्वातंत्र्यवाले प्राण्यांप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, त्यामुळे ते मनुष्यजन्म वाया घालवतात. २. व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे वागणे स्वकेंद्रित असते. ते इतरांची पर्वा करत नाहीत. यामुळे त्यांचा अहंभाव वाढतो. जितका अहंभाव कमी, तितकी सच्चिदानंदाची अनुभूती अधिक अधिक येते, हे त्यांना … Read more

तंत्रशास्त्राची वैशिष्टे

१. तंत्रशास्त्र शक्तीशी संबंधित आहे. त्याच्या पुढे भाव, चैतन्य, आनंद आणि शांती असे स्तर आहेत. २. तंत्रशास्त्राप्रमाणे कृती करतांना बहुदा स्थुलातील वस्तू लागतात, तर भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूतीसाठी स्थुलातील वस्तू लागत नाहीत. ३. व्यवहारातील अडचणी सोडवण्यासाठी तंत्रशास्त्र उपयुक्त आहे. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

गुरु आणि ईश्‍वर

यांच्या संदर्भात बोलतांना बरेच जण पुढील ओळी सांगतात. गुरु थोर की देव थोर म्हणावा नमस्कार आधी कुणासी करावा । मनी चिंतिता सद्गुरु थोर वाटे तयाचे प्रसादे रघुनाथ भेटे ॥ (पाठभेद – गुरु थोर कि देव थोर म्हणावा नमस्कार आधी कोणा करावा । मना माझीया गुरु थोर वाटे जयाच्या कृपाप्रसादे रघुराज भेटे ॥ ) त्यांनी हे … Read more

अंधश्रद्धा नाही, तर अंधविश्‍वास हा शब्द योग्य आहे, हेही ज्ञात नसलेले अंनिसवाले !

विश्‍वास हा शब्दांच्या, बुद्धीच्या स्तरावरचा असल्याने तो एकवेळ अंध असू शकतो; पण श्रद्धा ही अनुभूतीच्या स्तरावरील असल्याने कधीच अंध नसते. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

इंग्रजीप्रमाणे संस्कृतमध्ये शब्दलेखन (स्पेलिंग) शिकावे न लागणे

याचे कारण हे की, संस्कृतमध्ये उच्चारानुसार लिखाण असते. लिखाण डोळ्यांनी पहातो, म्हणजे ते तेजतत्त्वाशी संबंधित असते, तर शब्दाचा उच्चार करणे हे आकाशतत्त्वाशी संबंधित असते. तेजतत्त्वापेक्षा आकाशतत्त्व वरच्या स्तराचे असल्यामुळे लिखाणानुसार उच्चार न करता उच्चाराप्रमाणे लिखाण करणे आवश्यक असते. – डॉ. आठवले (१५.४.२०१४)