खरा ज्ञानी
खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
खरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
भावार्थ : स्वतःच्या आवडीचे नाम घेतांना त्यात थोडा तरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव तर नसतोच; पण त्या नामात चैतन्य असल्याने प्रगती लवकर होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज
हिमालयात एकांतात राहून आयुष्यभर साधना केली, तरी साधकातील स्वभावदोष आणि अहंभाव नष्ट झाले, याची खात्री देता येत नाही. असा साधक जेव्हा समाजात येतो, तेव्हा अनेक वर्षे प्रसंगच न घडल्याने निद्रिस्त असलेले त्याचे दोष बहुदा उफाळून येतात. याचाच अर्थ हा की, एकांतातील व्यष्टी साधनेत दोष लक्षात येत नाहीत. याउलट समष्टी साधनेत इतरांशी वारंवार संबंध येत असल्यामुळे … Read more
ईश्वरावर श्रद्धा ठेवा. घरातील वातावरण आधुनिक असले, तरी देवघर असावे. कुळधर्म-कुळाचार यांचे पालन करा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन मनाची एकाग्रता मनाची एकाग्रता ही अशी शक्ती आहे की, जी प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त करून देते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आध्यात्मिक प्रगतीचे महत्त्व आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप पालटत जातो आणि शाश्वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. आधुनिक वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने वागणे : … Read more
परमेश्वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्वर दिसतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सद्गुरूंचा शोध घेऊ नये ! खराखुरा सद्गुरु लाभणे, ही सुकृतावर आधारित गोष्ट आहे. आपल्या संचितानुसार योग्य वेळी सद्गुरूंची भेट होते. वृथा शोध घेऊ नये. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यरत हिंदुत्ववादी कार्यकर्ते अन् नेते यांचे कार्य आणि संत करत असलेले कार्य यांत जमीन-आकाशाइतका पुढीलप्रमाणे भेद आहे. येथे लक्षात घेतले पाहिजे की, संतांमध्येही प्रकार आहेत. येथे उल्लेख केलेले संत उच्च स्तराचे आहेत. १. कार्यकर्ते : हे मन आणि स्थूल देह यांच्या स्तरांवर कार्य करतात. २. नेते : हे बुद्धीच्या स्तरावर कार्य … Read more
आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन शिष्याने नेहमी सद्गुरूंशी एकनिष्ठ रहावे ! भाग्याने सद्गुरु लाभल्यास शिष्याने एकनिष्ठ रहावे, म्हणजे त्याच्याही नकळत त्याचा आध्यात्मिक विकास होत जाईल. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होय. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा ! गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
