आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न…

आतंकवाद्यांमुळे हिंदूंच्या ऐक्याची नितांत आवश्यकता असतांना, तसेच देशापुढे अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असता स्त्रियांच्या मंदिरातील प्रवेशावर आंदोलन करणे, म्हणजे भुकेला अन्न नसतांना घर हवे, यासाठी आरडाओरडा करणे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी आधी साधनेने वैचारिक प्रदूषण रोखा !

सगळीकडे प्रदूषण, पर्यावरणाची हानी इत्यादी विषयांच्या चर्चा होत असतात. शासनही काही उपाययोजना उद्घोषित करते. हे केवळ वरवरचे असते. प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे मानवाच्या मनातील रज-तमांचे प्रदूषण ! त्यावर उपाय न करता वरवरचे उपाय करणे हास्यास्पद आहे ! मनातील रज-तमाचे प्रदूषण दूर करण्यासाठी सर्वत्रच्या मानवांना साधना शिकवून त्यांच्याकडून ती करवून घेणे, हा एकच उपाय आहे ! … Read more

क्षमा

चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलिस, प्रशासनातील व्यक्ती, राजकारणी आणि राज्यकर्ते एकदा तरी क्षमा मागतात का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

निवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत !

काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. देवाने आपल्याला निवडावे, याऐवजी मतदारांनी आपल्याला निवडावे, अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्‍वास असतो ! असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का ? त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून … Read more

खाऊ देऊन मुलगा ऐकत नसेल, तर त्याला शिक्षा करावी लागते,…

खाऊ देऊन मुलगा ऐकत नसेल, तर त्याला शिक्षा करावी लागते, नाहीतर मूल डोक्यावर बसते. हेही ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले आणि अल्पसंख्यांकांचे सर्व तर्‍हेने लाड करणारे हिंदू आतंकवाद्यांविरुद्धचे युद्ध कधी जिंकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अडचणी दूर करण्याचे मूलभूत चार उपाय ज्ञात नसलेले हिंदू कधी जिंकतील का ?

१. साम (सामोपचाराने अडचण दूर करणे), २. दाम (पैसे देऊन अडचण दूर करणे), ३. दंड (शिक्षा करून अडचण दूर करणे) आणि ४. भेद (विरोधकांत फूट पाडून अडचण दूर करणे) हे अडचणी दूर करण्याचे चार उपाय आहेत. ते ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले हिंदू कधी जिंकतील का ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुटुंबात सर्वपुत्रसमभाव नसतांना राष्ट्रात मात्र सर्वधर्मसमभाव अशी घोषणा करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही !

कुटुंबातील ४ मुलांपैकी सगळ्यात सक्षम मुलाला वडील त्यांचा व्यवसाय चालवण्यास देतात. ते सर्वपुत्रसमभाव म्हणून इतर मुलांनाही चालवायला देत नाहीत. असे असतांना राष्ट्राचा कारभार मात्र सर्व राजकीय पक्ष आरक्षण ठेवून सर्वांच्या हातात देतात आणि सर्वधर्मसमभाव म्हणत केवळ अल्पसंख्यांकांना अधिक साहाय्य करतात; म्हणूनच देशाचे दिवाळे निघाले आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कर्माचे महत्त्व

कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत… सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. – संत भक्तराज महाराज

भारताच्या परमावधीच्या अधोगतीला रज-तमप्रधान राज्यकर्ते आणि प्रजा उत्तरदायी !

द्वापरयुगापर्यंत बहुसंख्य हिंदु राजे आणि प्रजा सत्त्वगुणप्रधान होती. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा असल्याने ते समर्थ होते. आता कलियुगातील बहुसंख्य हिंदु राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी, तसेच प्रजाही रज-तमप्रधान असल्याने कोणीच व्यष्टी साधनाही करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा नसल्याने भारताची परमावधीची अधोगती झाली आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूंना स्वतःची काळजी घेता आली नाही; म्हणून ते मोगल आणि…

हिंदूंना स्वतःची काळजी घेता आली नाही; म्हणून ते मोगल आणि इंग्रज यांच्या पारतंत्र्यात हजार वर्षे राहिले. अशा हिंदूंच्या मतानुसार लोकशाहीत निवडून आलेल्यांनी स्वातंत्र्यापासून ६८ वर्षे भारतात राज्य करणे यांसारखी हास्यास्पद, तसेच भारत आणि हिंदु धर्म यांचा नाश करणारी दुसरी गोष्ट कोणती नसेल ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले