संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे :…

संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे : एखाद्या संतांकडे गेल्यावर काही जणांना खूप चांगले वाटते किंवा त्यांचा भाव जागृत होतो, तर काही जणांना काहीच वाटत नाही. त्यातील काही जणांना काहीच न वाटल्यामुळे वाईटही वाटते. अनुभूती येणे किंवा न येणे याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. संतांच्या स्थूलदेहाकडे लक्ष जाणे : साधनेच्या आरंभी फक्त … Read more

हे शाळांना लज्जास्पद !

विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खाजगी शिकवण्या नव्हत्या. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्या सांगणे, हे अहं-निर्मूलनाच्या संदर्भात प्रथम…

स्वतःच्या चुका स्वीकारणे आणि त्या सांगणे, हे अहं-निर्मूलनाच्या संदर्भात प्रथम पाऊल आहे. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे…

आंधळ्यापाठून चालत जावे, तसे काही हिंदू बुद्धीप्रमाण्यावाद्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे आंधळा खड्ड्यात पडल्यावर त्याच्या पाठून जाणारे खड्ड्यात पडतात, तसे ते हिंदू बुद्धीप्रामाण्याद्यांबरोबर अधोगतीला जात आहेत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अशिक्षिताने सूक्ष्म जंतू नाहीत, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच…

‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर…

राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल…

विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही न करणा-या जन्महिंदूंना,…

साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही न करणार्‍या जन्महिंदूंना, म्हणजे ५० प्रतिशत हिंदूंना पुढे येणार्‍या आपत्काळात, म्हणजे तिसर्‍या महायुद्धाच्या काळात साहाय्य करून वाचवू नका; कारण हिंदु राष्ट्रात, म्हणजे रामराज्यात रहाण्यासाठी ते लायक नसतील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, मानवाचा मानवदेहधारी प्राणी बनवू नका !

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यवाले थयथयाट करतात. ते विसरतात की, प्राणी आणि मानव यांच्यात महत्त्वाचा भेद म्हणजे प्राणी व्यक्तीस्वातंत्र्यानुसार, म्हणजे स्वेच्छेने वागतात. याउलट मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि शेवटी ईश्‍वरेच्छेने वागणे त्याच्याकडून अपेक्षित असते. असे वागला, तरच तो खर्‍या अर्थाने मानव असतो, … Read more

सर्वसाधारण व्यक्ती, संत आणि पंचमहाभूते

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, हे सर्वसाधारण व्यक्तीच्या संदर्भात खरे असते; कारण त्यांचे कार्य पंचमहाभूतांच्या स्तरावरचे असते. याउलट संतांचे कार्य शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या स्तरावरचे असल्यामुळे त्याचा संबंध शब्द, स्पर्श, रूप… यांच्याशी नसतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले