‘जर एखाद्या साधकाने सर्वसंगपरित्याग करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे, तर त्याने गुरु सांगतील ती सेवा झोकून देऊन करावी, मग कितीही संघर्ष करावा लागला, तरी चालेल. या संघर्षाचे फळ गोडच असते. गुरु शेवटी साधकाला चिरंतन अशा आनंदमय ईश्वराची प्राप्ती करून देतातच; परंतु मायेचे तसे नसते. मायेत होणारा संघर्ष शेवटी आपल्या पदरात दुःखच टाकतो. तो आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यात अडकवतो.
तात्पर्य : मायेत अडकवणार्या भावनेतील विचारांमध्ये रहाण्याऐवजी ज्या देवाने आयुष्य दिले आहे, त्या देवाला अनुभवण्यासाठी भावस्थितीत रहाण्याचा अखंड प्रयत्न करावा.
– श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !