१. ‘स्वतःची प्रगती व्हावी’, असे वाटत असेल, तर साधकाने पूर्ण अंतर्मुख झाले पाहिजे !
२. साधकाच्या मनावर परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार झाला की, त्याचा साधनेतील वेळ वाया जात नाही !
३. साधना कृतज्ञतापूर्वक करायला हवी. सतत देवाला नमस्कार करून त्याच्या चरणी अक्षरशः लोळण घेतली की, तो मार्ग दाखवणारच !
४. ‘भगवंताला क्षणोक्षणी मन अर्पण करणे’, ही खरी कृतज्ञता आहे.
५. पदार्थात मीठ नसेल, तर जेवणाला अर्थ नसतो; तसे जीवनात भगवंत नसेल, तर जीवनाला अर्थ उरत नाही.
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !