आस्तिकतेचे महत्त्व

‘आस्तिकता कोहिनूर हिर्‍यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे. प्रतिष्ठा, पत, मित्र, स्वकीय सगळे निरर्थक आहेत. स्वत:च्या शरिराचाही भरवसा नाही. मृत्यूपासून केवळ आस्तिकताच सोडवते. आस्तिकताच अमृतत्त्व देते. आस्तिकच मृत्यूचे निर्भयपणे स्वागत करू शकतो. आस्तिकाचे चित्त अखंड भगवंतातच असते. भगवंताविना बाकीचे आधार हे आधार नाहीतच. बुडणारे कसला आधार देणार ? तरणारा आहेच कोण येथे ?’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, नगर (साभार : मासिक ‘घनगर्जित’, मे २०२१)

Leave a Comment