साधनेत फळाची अपेक्षा न ठेवण्याचे कारण !

‘गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना शिष्याचा सर्व भार गुरूंनी उचललेला असतो. गुरु त्याला त्याच्या मागच्या जन्मीची साधना, त्याचे प्रारब्ध, देवाणघेवाण हिशोब, साधना करण्याची क्षमता, वाईट शक्तींचा त्रास यांसारख्या विविध घटकांचा विचार करून साधना शिकवतात. हे सर्व घटक त्या साधकासाठी त्याच्या वैयक्तिक कर्जाप्रमाणे असतात. तो करत असलेली साधना, त्याचे हे ‘कर्ज’ फेडण्यासाठी वापरली जाते. यात महत्त्वाचे म्हणजे, त्या साधकाला ‘त्याच्यावर किती कर्ज आहे ?’, हे ज्ञात नसते आणि त्याला ते कळणेही शक्य नसते. हे कर्ज फेडण्यासाठी केवळ ‘गुरूंनी सांगितलेली साधना श्रद्धेने करत जाणे’, हेच त्याचे क्रियमाण कर्म असते. त्यामुळे ‘मी साधना करतो, तरी मला साधनेने अद्याप काही साध्य का झाले नाही ?’, असा विचार करू नये.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment