साधकांनो, आपत्काळ चालू झाल्याची चिन्हे आता दिसून येत आहेत. विविध माध्यमांतून साधकांना होणारे त्रास, हे त्याचेच लक्षण आहे. या त्रासातही आनंदी राहून परिस्थितीवर मात करण्यासाठी साधनेद्वारे चैतन्याचा जागर करा !
स्वतःतील चैतन्याचा जागर कसा करायचा ?
स्वतःतील ‘मी’ ला विसरून चैतन्याशी अनुसंधान ठेवा !
आपण देवीचे तत्त्व जागृत होण्यासाठी तिचा जागर करतो. त्याचप्रमाणे आपल्यातील ‘मी’ ला विसरून, चैतन्याला समोर आणून, म्हणजेच सतत चैतन्याशी अनुसंधान ठेवून त्याचा जागर करा ! म्हणूनच संत भक्तराज महाराज म्हणतात, देह प्रारब्धावरी सोडा । चित्त चैतन्यासी जोडा । आणि वेड्या वेड्या पहातो काय । जातो क्षण हा वाया ।
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
साधनेने व्यक्तीचा अहं अल्प होऊ लागल्यावर तिच्या जीवनाचे सारथ्य भगवंतच करतो !
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !
आध्यात्मिक पूर्वतयारीचे महत्त्व !