आपल्याच मतदारकेंद्रातील जनतेला लुबाडणारे लोकप्रतिनिधी !

‘एखादा वडील झाला, म्हणजे त्याच्यावर मुलाचे उत्तरदायित्त्व असते. तो ते दायित्त्व पार पाडतो, म्हणजे त्या मुलाची सर्वतोपरी काळजी घेतो. याउलट निवडून आलेले बहुतेक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारकेंद्रातील जनतेला ‘लुबाडण्याचे एक हक्काचे स्थान’ समजतात !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पोलीसखाते आणि प्रशासन यांची झालेली दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीसखाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनचे कार्य प्रत्येक जिज्ञासूच्या उद्धारासाठी असणे !

‘भगवान त्याच्या केवळ एका भक्तासाठीही अवतार घेतो. याच तत्त्वाने सनातनचे कार्य चालू आहे, उदा. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला एखाद्या ठिकाणी चांगला प्रतिसाद नसला, तरी त्या भागातील एका जिज्ञासूसाठी तेथे कार्य केले जाते. त्या एका जिज्ञासूची आध्यात्मिक प्रगती होणे महत्त्वाचे आहे. एखादा ग्रंथ प्रकाशित केल्यावर त्याची खूप विक्री झाली नाही, तरी चालेल; पण ‘ज्या जिज्ञासूला तो आवश्यक … Read more

आपल्यातील गुण ओळखून त्यांचा ईश्वराच्या सेवेत योग्य उपयोग करून घेता आला पाहिजे !

देवाने प्रत्येकाला काहीतरी चांगले गुण दिलेले असतात. स्वतःमधील त्या दैवी गुणांना ओळखून त्यांचे संवर्धन करायला हवे. या गुणांचा देवाची सेवा, समष्टी सेवा आणि गुरुकार्य करणे यांसाठी लाभ करून घेता आला पाहिजे, तरच ईश्वराने आपल्याला देऊ केलेल्या या गुणांचे सार्थक झाल्यासारखे होईल. गुणसंवर्धनाने आपल्यातील साधनेचा उत्साह वाढल्याने मन अधिकाधिक सकारात्मक बनते. मनोबळ वाढले की, सेवाही चांगली … Read more

‘सेवेचे दायित्व घेणे, म्हणजे काय ?’, याची जाणीव होण्यासाठी मनाला पुढील प्रश्न विचारणे आवश्यक !

‘देवाने माझ्यावर सेवेचे दायित्व दिले आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून सेवा होत आहे ना ? मी देवाला अपेक्षित अशी सेवा करत आहे ना ? ‘सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळून सेवेच्या माध्यमातून साधनेचे ध्येय गाठणे’, या अनुषंगाने माझी सेवा चालू आहे ना ? ‘ही सेवा मला गुरूंच्या कृपेने मिळाली आहे’, याची सतत जाणीव ठेवून मी सेवेतून आनंद मिळवण्यासाठी … Read more

भक्त प्रल्हादासारखी खडतर साधना करणारा साधकच या आपत्काळात जिवंत राहील !

आपत्काळाची तीव्रता आता इतकी वाढत चालली आहे की, जे देवाचे खरे भक्त असतील, तेच या कठीण काळात टिकाव धरू शकतील. देवाने आता अशी चाळण लावली आहे की, ‘जे समष्टीचा विचार करून साधना करतील आणि ज्यांची देवावर पूर्ण श्रद्धा असेल, त्यांनाच तो पुढे घेऊन जाणार आहे. नाहीतर, आता ‘सुक्यासह ओलेही जळते’, या उक्तीप्रमाणे कधीतरी छंद म्हणून … Read more

आता केवळ रामराज्य हवे !

‘भारतातील लोकशाहीचा स्वातंत्र्योत्तर ७४ वर्षांचा इतिहास पहाता ‘आता राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी कोणत्याही भ्रष्ट आणि दुराचारी राजकीय पक्षाचे राज्य नको, तर केवळ रामराज्य हवे’, असे वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

‘ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो. अन्य साधनामार्गांमध्ये ‘सांगितलेले केवळ कृतीत आणणे’, इतकेच असते. त्यात प्रारंभापासूनच बुद्धी कार्यरत नसते. त्यामुळे बुद्धीलय लवकर होतो. यामुळेच ज्ञानयोगाच्या तुलनेत अन्य साधनामार्गांमध्ये आध्यात्मिक प्रगती जलद होते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (४.१.२०२२)

अनुभूती विकत घेता येत नाही, तर त्यासाठी पात्र व्हावे लागते !

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आपण ज्या प्रमाणात किंवा ज्या टप्प्याची साधना (कृती) करू, त्या टप्प्याचे अध्यात्माचे विविध पैलू अनुभूतींच्या माध्यमातून लक्षात येऊ लागतात. प्रत्येक टप्प्याची अनुभूती येण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साधना करून त्यासाठी सक्षम (पात्र) असणेही आवश्यक असते. कुणालाही पैसे देऊन अनुभूती विकत घेणे शक्य नसते. दुसरे म्हणजे एखाद्याने पात्रता नसतांना ती घेण्याचा प्रयत्न … Read more