देवाचे भक्त होण्याचे महत्त्व !

‘आपण देवाचे भक्त बनलो की, देव आपत्काळातही आपल्या तोंडात सोन्याचा चमचा ठेवतो, म्हणजेच तो आपल्याला आपत्काळाची झळ लागू देत नाही !’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

भक्ती ही सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम असणे

‘भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. ते शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. भक्तीचे वर्णन करावयास मानवी शब्द न्यूनच पडतील. भक्ती भक्तांच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाने समजू शकते. स्वानुभवानेच अनुभवता येणार्‍या भक्तीविषयी शब्दांच्या अवडंबराने कंठशोष करण्यापेक्षा तिचा अनुभव घेऊन पहा, ती समजून घ्या, तिच्यापासून चांगली फळे प्राप्त करून घ्या. भक्तीमार्ग सर्वांना अनुकूल असाच आहे. सर्व … Read more

मनुष्याचे स्वातंत्र्य !

‘मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर १९९८)

अध्यात्मात तेजतत्त्वापेक्षा सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाची अनुभूती कानांनी येत असल्याने डोळ्यांपेक्षा कान हे श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय असणे

‘आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या सर्व अवयवांमध्ये आपला सर्वात महत्त्वाचा अवयव डोळे असतात’, असे आपल्याला जाणवते. त्यामुळे ‘डोळे हा मनाचा आरसा असतात’, असेही म्हणतात; परंतु सृष्टीतील पंचभौतिक पदार्थांचे ज्ञान करून घेण्यासाठी ईश्‍वराने आपल्याला पंचज्ञानेंद्रिये दिली आहेत. पंचज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांनी तेजतत्त्वाची अनुभूती येते, तर कानांनी आकाशतत्त्वाची अनुभूती येते. आकाशतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा अधिक सूक्ष्म असल्यामुळे कानांच्या माध्यमातून अधिक … Read more

समाजात समता नांदावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या गुणकर्मानुसार त्याला विषम अधिकार देणे अनिवार्य असणे !

‘समतेसाठी लढणार्‍या सैन्यात सेनापती, हाताखालचे निरनिराळे अधिकारी, चतुरंगसेना इत्यादी भेद (फरक) परस्पर अधिकार तारतम्यामुळे असतातच. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार आज्ञाकारी, आज्ञाधारी हे भेद नाहीसे केल्यास कोणतेच राष्ट्र टिकणार नाही. कोणत्याही खात्यात, न्यायालयात उच्च-नीच भेद, अधिकार – तारतम्य आणि अल्प-अधिक कार्यक्षमता असतेच. सर्व भेदांचे निर्मूलन करण्यासाठी भरलेल्या सभेतही, स्थापलेल्या समाजातही, समतेचा उदो उदो करणार्‍या राष्ट्रातही अध्यक्ष, उपाध्यक्ष … Read more

शोकांतिका !

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाइम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवीत !

‘आज बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवी आहेत. नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर – संदेश’, फेब्रुवारी २००३)

विरक्ताने जीभ आवरावी !

‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही. हे झाले सज्जन गृहस्थाचे. ज्यांना स्त्रियांचे आणि उपाहारगृहातील चटकदार पदार्थांचे व्यसनच लागले आहे. त्यांना कुबेराची संपत्तीही अल्पच पडेल. एकंदरीत पैशाचा विनियोग प्रायः एक स्त्री आणि दुसरी जीभ, या दोघींचा हट्ट पूर्ण करण्याकडेच होत असल्यामुळे … Read more

भारत भूमीची महानता !

‘भारत भूमीत जन्माला येणार्‍या प्राणीमात्रांनाही जे भाग्य लाभले आहे, ते पाश्‍चात्त्य देशांतील अधिनायकांनाही लाभलेले नाही.’ – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय वर्षीय धर्मसंघ

चिरंतन आनंद प्राप्तीसाठी साधनेला पर्याय नाही !

देवावर आणि साधनेवर विश्‍वास नसला, तरी चिरंतन आनंद प्रत्येकालाच हवा असतो. तो केवळ साधनेने मिळतो. एकदा हे लक्षात आले की, साधनेला पर्याय नसल्याने मानव साधनेकडे वळतो. – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले