हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात भाव कसा ठेवावा ?

‘राष्ट्रभक्त आणि क्रांतीकारक राष्ट्रातच देवाला पहातात; म्हणून ते राष्ट्रावर निरपेक्ष प्रेम करतात अन् राष्ट्रासाठी प्राणांचेही बलीदान करतात. विविध संप्रदाय आणि साधनामार्ग यांनुसार साधना करणार्‍या बहुतांशी साधकांनी गतजन्मांमध्ये व्यष्टी साधना केलेली असल्याने ते वर्तमान जन्मातही गुरु किंवा देव यांच्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात आणि व्यष्टी साधनेसाठी जीवन समर्पित करू शकतात. आता काळानुसार समष्टी साधना, म्हणजे हिंदु … Read more

व्यष्टी साधनेचा पाया भक्कम हवा !

‘व्यष्टी साधना चांगली असेल, तर आपली क्षमता वाढते, सकारात्मकता निर्माण होते आणि समष्टी साधना करण्यासाठी ऊर्जा मिळते. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्‍या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.’ – (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

नश्ववर देह आणि आत्मा

‘या नश्‍वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचेही काही वाटत नसते. जसे ताप आलेल्या मनुष्याने कुपथ्य केल्यास ताप वाढतो, तसा शृंगार हा विषयवासनायुक्त मनुष्यास अधोगतीस नेण्यास पात्र होतोे. क्षयी मनुष्यास … Read more

संशोधनाच्या संदर्भात कुठे बालवाडीतील असल्याप्रमाणे पाश्चात्त्य संशोधक, तर कुठे सर्वज्ञ ऋषि !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

मनाला नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्व !

‘आपले मन नियंत्रणात न ठेवता, कह्यात न ठेवता, मानेल तसे भटकण्यास त्याला मोकळीक दिली, तर ते बेलगाम होईल. केवळ असमाधानीपणामुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतील. विषयसुखाभिलाषी अशा सुखोपभोगांनी अशा व्यक्तींना कधीही तृप्ती मिळणार नाही.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘ श्रीधर-संदेश’, ऑगस्ट १९९९)

स्वतःच्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन होणे महत्त्वाचे !

‘या सुकणार्‍या, नश्‍वर देहाचा अभिमान किती दिवस ठेवायचा? यामध्ये काय आहे ? आनंदघनाचे स्वरूप विसरण्यास याचा अभिमान कारण बनून अपरिमित दुःखास कारणीभूत होत असेल, तर याचा अभिमान सोडण्यास कोणता मुहूर्त पहावयास हवा ? भ्रमात राहू नकोस, आपल्या आत्मरूपाचा शोध घेऊन आनंदघन हो, खरोखरंच दुसरे काहीही नाही. जन्म-मरणाची वार्ता हे शेवटचे भाष्य आहे.’ – प.प. भगवान … Read more

दुष्कर्मी लोकांची मानसिकता !

‘दुष्कर्मी लोक दुराचारासाठी एकत्र आले, तरी त्यांचे मित्रत्व कामापुरतेच असते. थोडेसे जरी बिनसले, तरी ते एकमेकांचे शत्रू होतात, एवढ्यावरूनच न थांबता ते एकमेकांच्या विनाशाचीच इच्छा धरतात.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, मार्च २००३)

चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य !

‘जे दृश्य आहे, ते विनाशी आणि जे अदृश्य असून चेतन स्वरूपी आहे, ते अविनाशी; पण विनाश पावणारी वस्तू केव्हाही सुखदायी असत नाही; म्हणून ते चेतनस्वरूप प्राप्त करून घेणे, हेच सुखाचे साध्य आणि तोच दुःख निवारणाचा उपाय होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, मार्च २००२)

दान कसे असावे ?

‘देश, काल आणि पात्र पाहून, तसेच सत्कारपूर्वक, शुद्ध बुद्धीपुरस्सर अन् प्रतिफळाची आशा न धरता दिलेले दानच खरे दान आणि तेच गृहस्थाचे मोठे तप होय.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : ‘श्रीधर-संदेश’, जून २००१)

दुस-यांना विचारून करण्याचे महत्त्व

‘श्रीगुरूंच्या आश्रमाचे किंवा संस्थेचे सर्व नियम न चुकता पाळले पाहिजेत. तसे न करता जर एखाद्याने नियमबाह्य (नियमाविरुद्ध) वर्तन केले आणि ते पाहून जर दुसराही तसेच वागला, तर त्यामुळे सर्वांचेच अहित होईल, तसेच संस्थेची शिस्त आणि सुव्यवस्था कोलमडून जाऊन त्यामुळे श्रीगुरुही अपकीर्त होतील. असे झाल्यास आपली प्रगती (आध्यात्मिक) होणार नाही. त्यामुळे श्रीगुरूंनी आपल्याच उद्धारासाठी स्थापलेली संस्था … Read more