ज्ञान आणि अज्ञान यांतील भेद

‘जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे. जे मायेत अडकवते, जे अशाश्वताविषयी सांगते आणि जे अहंकार जोपासते ते ‘अज्ञान’ आहे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१२.९.२०१७)

देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवण्याचे महत्त्व !

अ. साधकांनी ‘स्वतःकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया होत नाही’, असा विचार करत रहाण्यापेक्षा देवाशी अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘देवाशी असलेले अनुसंधानाचे विचारच साधकाला मोक्षापर्यंत नेतात; म्हणून देवाच्या चरणी शरणागतभाव ठेवून प्रत्येक कृती करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’ आ. ‘प्रत्येक प्रसंगात समोरच्या व्यक्तीला छान (योग्य शब्दांत) उत्तर देणे’, ही … Read more

हे अधिक भयावह प्रदूषण !

‘स्थुलातील, म्हणजे देह आणि वस्तू यांनी केलेल्या तात्कालिक प्रदूषणापेक्षा सूक्ष्मातील, म्हणजे मन आणि बुद्धी यांनी केलेले प्रदूषण अनेक पटींनी अधिक काळ हानीकारक असते, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक-शिष्य होणे केव्हाही श्रेयस्कर !

‘कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी होण्यापेक्षा साधक किंवा शिष्य होणे लाखो पटींनी श्रेष्ठ असते; कारण राजकीय पक्षात गेल्यावर रज-तम गुण वाढतात, तर साधक किंवा शिष्य झाल्यास सत्त्वगुण वाढतो. त्यामुळे देवाकडे वाटचाल होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण व्हावे’, यासाठी रुग्णालयातील रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, आधुनिक वैद्य, परिचारिका इत्यादी सर्वांनी अधिकाधिक नामजप करावा !

‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही. त्यांपैकी अतृप्त लिंगदेह किंवा वाईट लिंगदेह त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी, उपचारांसाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इत्यादींना त्रास देऊ शकतात. रुग्णालयात विविध व्याधींनी त्रस्त … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे सर्वांत मोठे दोन दोष म्हणजे जिज्ञासेचा अभाव आणि ‘मला सर्व कळते’, हा अहंभाव !

‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पगार देणारी नोकरी आणि आनंद देणारी सेवा !

‘सनातन संस्थेमध्ये विद्यावाचस्पती (पीएच्.डी.), आधुनिक वैद्य, अभियंते यांसारखे उच्च विद्याविभूषित साधक त्यांची नोकरी सोडून पूर्णवेळ साधना करत आहेत. नोकरीमध्ये त्यांना प्रतिदिन ८ – १० घंट्यांच्या कामासाठी प्रतिमास सहस्रो रुपये पगार मिळत होता. सनातन संस्थेमध्ये नोकरीप्रमाणे पगार मिळत नसला, तरी हे साधक प्रतिदिन स्वतःहून नोकरीपेक्षा अधिक घंटे सेवा करतात. याचे कारण हे की, त्यांना नोकरीच्या ठिकाणी … Read more

केवळ हिंदु धर्मात अनेक देव कसे ?

‘काही इतर धर्मीय हिंदूंना चिडवतात, ‘देव एकच आहे, तर तुमच्या धर्मात अनेक देव कसे ?’ अशा अभ्यासशून्य व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, हिंदु धर्म सर्वांत परिपूर्ण असा धर्म आहे. पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचे उदाहरण घेतले, तर हे लक्षात येईल की, पूर्वी विविध रोगांवर असलेली औषधे मर्यादित संख्येची होती. विज्ञानाने प्रगती केली, तशी औषधांची संख्या बरीच वाढली. … Read more