समष्टी सेवेत सातत्य असल्यावर देवाचा आशीर्वाद आणि कृपा दोन्ही प्राप्त होणे

‘व्यष्टी साधना करतांना देवाचा आशीर्वाद मिळतो; मात्र समष्टी सेवेमध्ये असल्यावर देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची कृपाही प्राप्त होते. आशीर्वाद काही काळापुरताच टिकतो; परंतु कृपा चिरंतन असते. समष्टी सेवेत सातत्य असल्यावर आशीर्वादाचे रूपांतर कृपेत होते.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

समष्टी सेवेमुळे अहं लवकर अल्प झाल्याने देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होणे

‘समष्टी सेवेमुळे भगवंताच्या निर्गुण निराकार तत्त्वाशी शीघ्रतेने एकरूप होता येते; कारण समष्टी सेवा करतांना आपल्या इच्छा सोडून इतरांची इच्छापूर्ती होण्यासाठी जगावे लागते. यातून अहं लवकर अल्प होतो. त्यामुळे देवरूपी सगुण रूपाकडून निर्गुण ईश्वरापर्यंतचा प्रवास सोपा होतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

नामाच्याही पुढे केवळ ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागतो आणि तेव्हा देवच भक्ताची सेवा करू लागतो

‘नामाच्याही पुढे केवळ एकच ध्यास उरतो, तो म्हणजे ईश्वरप्राप्तीचा ! ईश्वरालाच ‘ब्रह्म’, असे म्हणतात. ‘ब्रह्म’ एकच आणि अविनाशी आहे. भक्ताच्या या अवस्थेत देवच भक्ताचे नाम घेण्याचे कार्य करतो. आधी भक्त देवाची सेवा करतो आणि नंतर देवच भक्ताची सेवा करू लागतो.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्री गुरूंची सेवा केल्यावर संकुचित वृत्ती जाऊन व्यापकता येणे

‘भगवंत किंवा गुरु यांची सेवा करणे’, हेच आयुष्यातील आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यामुळे संकुचित वृत्ती सुटते आणि समाजाच्या कल्याणाचा विचार होऊ लागतो. व्यापक संकल्पना मनात आणल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही; कारण भगवंत व्यापक आहे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

बुद्धीप्रामाण्यवादी आणि कुंडलिनी शक्ती !

साधना केल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होते. हे आतापर्यंतच्या युगांत लाखो साधकांनी अनुभवले आहे; पण साधनेवर विश्‍वास नसणारे बुद्धीप्रामाण्यवादी साधना न करता म्हणतील, ‘कुंडलिनी दाखवा, नाहीतर ती नाहीच !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

उत्तम शिष्याचे लक्ष्य (ध्येय) आणि लक्षण

१. लक्ष्य (ध्येय) : ‘श्री गुरूंच्या शिकवणीनुसार स्वतःला पूर्णत: गुरुचरणी (परमात्मास्वरूपात) समर्पित करणे, हे उत्तम शिष्याचे ध्येय असते. २. लक्षण : गुरूंची इच्छा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची शिकवण स्वीकारणे आणि त्यानुसार आचरण करणे, या स्थितीत सतत रहाणे, हे उत्तम शिष्याचे लक्षण आहे.’ – (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, (१३.१.२०२३)

‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होऊ नये; म्हणून कधी कुणाकडे काही मागू नका !

‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! दोन व्यक्तींमधील ‘देवाण-घेवाण हिशोब’ निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे, एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीकडून काहीतरी मागून घेणे. अशा मागण्यामुळे आपण इतरांचे देणेकरी होतो. त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी. असे असले … Read more

स्थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या शुद्धीसाठी करावयाची साधना !

देहाचा प्रकार आणि करावयाची साधना १. स्थूल – उपवास, प्राणायाम, हठयोग २. सूक्ष्म ( मन ) – नामजप, स्वभावदोष निर्मूलन ३. कारण (बुद्धी) – अध्यात्माचा अभ्यास ४. महाकारण (अहं) – कृतज्ञता, शरणागती आणि श्रद्धा वाढवणे, तसेच अहंनिर्मूलनाचे प्रयत्न करणे – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

शरीरशुद्धीला महत्त्व द्या !*

‘शरीर ही पहिली वास्तू आहे. प्रथम तिच्या शुद्धीचा विचार करावा, नंतर बांधलेल्या वास्तूचा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले