जीवनातील चिरंतन जागृतीचे महत्त्व
जीवनात चिरंतन जागृती हवी. देहातून प्राण निघून गेल्यानंतर चिरनिद्राच आहे; कारण त्या वेळी उठवले, तरी माणूस उठत नाही.
जीवनात चिरंतन जागृती हवी. देहातून प्राण निघून गेल्यानंतर चिरनिद्राच आहे; कारण त्या वेळी उठवले, तरी माणूस उठत नाही.
मन, आत्मा, इंद्रिये आणि वस्तू यांचे संतुलन अन् संयोग झाला, तर कार्य होते. योगः कर्मसु कौशलम् ।, म्हणजे समत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. मनाची शांतता आणि आत्म्याशी संतुलन होणे महत्त्वाचे. मन हे वृत्तीप्रमाणे बनते. त्यामुळे वृत्तीत पालट होणे महत्त्वाचे आहे. प्रायश्चित्ताने मन वळवले पाहिजे.
काळ हा आपल्याला अध्यात्म शिकवणारा उत्तम शिक्षक आहे. तो आपल्यासाठी परिस्थिती, परिणाम, प्रारब्धामुळे येणार्या सुख-दुःखाच्या गोष्टी असे सर्व घेऊन येत असतो. काळाला ईश्वर समजून सामोरे गेले, तर जीवनातील नित्य घडणार्या गोष्टींचे काहीच वाटत नाही. त्यामुळे आपल्याला प्रारब्धावर सहजतेने मात करता येते.
‘या जगतातील सर्व दृश्य-अदृश्य कार्य हे महान चैतन्यशक्तीद्वारे चालते; परंतु आपण बहिर्मुख होऊन आवरणाशी संबंध ठेवतो आणि ‘आवरणाद्वारे कार्य चालते’, अशी आपली भावना होते. त्यामुळे सामान्य जनतेची फसगत होत आहे. भौतिक सुखाच्या लालसेमुळे भौतिक सुखात रमणे, भौतिक सुखाची प्राप्ती करणे, यासाठीच सर्व वेळ घालवला जातो. विज्ञान आणि संशोधन हेसुद्धा याच विचारसरणीला पूरक झाले आहे. त्यामुळे … Read more
काही साधकांचे साधनेचे प्रयत्न पूर्वीच्या तुलनेत चांगले चालू असतांनाही त्यांना अनुभूती येत नाहीत; म्हणून ते निराश होतात. देव प्रामुख्याने साधकाची अध्यात्मावरील श्रद्धा वाढण्यासाठी त्याला अनुभूती देत असतो. एखाद्याची अध्यात्मावर श्रद्धा असेलच, तर देव त्याला अनुभूती कशाला देईल ? सध्याच्या संकटकाळात सहाव्या आणि सातव्या पाताळांतील वाईट शक्तींची साधकांवर जीवघेणी आक्रमणे होत असतांनाही गुरूंच्या कृपेमुळे साधक जीवित … Read more
अध्यात्मातील कृतीचे महत्त्व सनातन संस्थेत सप्ताह, पारायणे होत नाहीत, तर साधनेत कृती करून पुढे जाण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन सत्संग आणि साधनेचा आढावा घेणे हे नित्यनियमाने होते. पारायणातून केवळ तात्त्विक माहिती मिळते; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेतून अहं लवकर अल्प झाल्याने देवाविषयीच्या अनुभूती लवकर येतात. केवळ पारायण न करता साधनेची प्रत्यक्ष कृती केल्यास ईश्वराविषयीची प्रायोगिक … Read more
खरे शिक्षण : संसारात राहून गोपी करत असलेली भक्ती शिकणे, हे खरे शिक्षण आहे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला अशी भक्ती करायला शिकवत आहेत.
चुका झाल्यावर क्षमायाचना केल्याने चुकांमुळे निर्माण झालेला मनावरचा ताण घटतो आणि मनाला समाधान लाभते. मनुष्याचे जीवन हे कर्ममय आहे. मनुष्याने केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे त्याला मिळतेच. चुका केल्याने पाप लागते. चुका झाल्यावर केवळ क्षमायाचना केल्याने पाप नष्ट होत नाही; पण प्रायश्चित्तही घेतले, तर पापाचे परिमार्जन होण्यास साहाय्य होते.
‘चित्र काढतांना ते दुसर्यासाठी असल्यास त्यांच्या आवडी लक्षात घेऊन ते काढा. चित्र साधकांसाठी असल्यास त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यातून चैतन्याची अनुभूती येणे आवश्यक असते, तर चित्र इतरांसाठी असल्यास त्यांच्या सुखासाठी ते डोळ्यांनी चांगले दिसणे आवश्यक असते.’
अध्यात्माचे श्रेष्ठत्व आणि विज्ञानाच्या मर्यादा कलियुगामधे अनेक लोक विविध वैज्ञानिक प्रयोग करतात. ते सर्व प्रयोग यशस्वी होतातच, असे नाही. कित्येकदा विज्ञानातील प्रयोग चुकल्यामुळे त्यासाठी वापरलेले मनुष्यबळ, आर्थिक गुंतवणूक आणि वेळ अशी सर्व प्रकारची ऊर्जा प्रयोगाच्या अंती वाया जाते, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अध्यात्मात मात्र तसे होत नाही. साधकाने ईश्वराला संपूर्ण शरण जाऊन श्रद्धा … Read more