कर्माची फलनिष्पत्ती
‘कर्म कुठले करायचे ?’, ते आपल्या हातात असते. ‘त्याचे फळ केव्हा द्यायचे ?’, हे देवाच्या हातात असते.
‘कर्म कुठले करायचे ?’, ते आपल्या हातात असते. ‘त्याचे फळ केव्हा द्यायचे ?’, हे देवाच्या हातात असते.
अयं प्रपञ्चो मिथ्यैव सत्यं ब्रह्माहमद्वयम् । अत्र प्रमाणं वेदान्ता गुरवोऽनुभवस्तथा ॥ – योगवासिष्ठ, प्रकरण ३, अध्याय २१, श्लोक ३५ अर्थ : अनुभवाला येणारा प्रपंच विस्तार, नानात्व (विविधता) हे केवळ भासमान होणारे आहे. केवळ एकमात्र ब्रह्मच सत्य, शाश्वत आहे आणि ते आपणच आहोत. याविषयी वेदादी सत्शास्त्रे, गुरु आणि शेवटी स्वतःचा अनुभव हीच प्रमाणे होत.
‘दैनिक सनातन प्रभातमधील प्रत्येक शब्द परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याने भारित झालेला आहे. त्यामुळे दैनिक सनातन प्रभात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज युक्त चैतन्याने भारित झाले आहे. यातील प्रत्येक शब्दाच्या प्रभावाने वाचकावरील रज-तमाचे आवरण निघून जाईल आणि त्याची आत्मोन्नती होईल ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्यातील चैतन्यामुळे साधकांना अनुभूती येतात. त्या दैनिक सनातन … Read more
ईश्वराने मनुष्याला बनवतांना स्वतःचा एक अंश घालून (ईश्वरी अंश = आत्मा) आणि लीला रचण्यासाठी त्या आत्म्याभोवती मायेचे (त्रिगुणाचे) आवरण घातलेे. मनुष्य म्हणजे र्ईश्वरी अंश + माया. त्याने मनुष्याला त्याच्या आत्म्याभोवती असलेले मायेचे आवरण दूर करून ईश्वरस्वरूप (आत्मस्वरूप) हो, असे ध्येय दिले. मनुष्य ईश्वरस्वरूप झाल्यावर त्या जिवाची लीला पूर्ण होतेे. सर्व मानव ईश्वरस्वरूप झाल्यावर जगत्लीला पूर्ण … Read more
‘दिवसभर श्रम झाल्यामुळे निसर्गतःच रात्री शरीर थकते, तसेच मन आणि बुद्धी हेही थकतात. रात्री वातावरणातील वाईट शक्तींचा संचार अधिक असल्यामुळे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण येण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे जागरण करून सेवा, विशेषतः बौद्धिक सेवा करतांना सेवेत सुचण्याचे प्रमाण आणि सेवेची गती अल्प होते अन् चुका होण्याची शक्यता वाढते. यामुळे सेवेची फलनिष्पत्ती घटते. जागरणाचे … Read more
अध्यात्मात वेडे झाल्यानंतरच शहाणपण येते, म्हणजे देवाचा ध्यास घेऊन साधना केली की, आध्यात्मिक उन्नती होऊन संतपदाकडे वाटचाल होते.’ – पू.( सौ.) अंजली गाडगीळ
आश्रमात राहिल्याने आवड-नावड संस्कार घटतो, दुसर्याचे ऐकण्याची सवय लागते आणि परेच्छेने वागावे लागते. त्यामुळे मनोलय होण्यास साहाय्य होते.
‘प्रतिदिन कोणतेही कर्म करतांना आपण स्वतःला, म्हणजेच अहंला महत्त्व देतो. प्रत्यक्षात अहंचे अस्तित्व चैतन्यदायी आत्म्यामुळेच आहे. त्यामुळे खरेतर आत्म्याला महत्त्व द्यायला हवे. आत्म्याला महत्त्व द्यायचे, म्हणजे ‘आत्म्यामुळेच कार्य होत आहे’, याचे स्मरण ठेवून प्रत्येक कृती करायची. अशा रितीने प्रत्येक कृती केल्यास ती कृती ईश्वरेच्छेने होईल. यासाठी ‘आत्म्याला आपला मित्र करावे’, म्हणजे त्याला सतत विचारून विचारून … Read more
आपल्या प्रारब्धात असेल, तेवढेच देव देतो. साधना न करता सकामातील नुसत्या प्रार्थना कितीही केल्या, तरी आपण मागतो, ते देव देत नाही. असे असतांना प्रार्थना करायची कशाला, तर प्रार्थनेमुळे अहंभाव न्यून होण्यास साहाय्य होते; म्हणून !
भावाच्या पुढे अव्यक्त भाव असतो. गुरूंचे रूप समोर असतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून कार्य करणे, हा ‘व्यक्त भाव’. गुरूंचे रूप समोर नसतांनाही त्याची अनुभूती घेत कार्य करणे, म्हणजे ‘अव्यक्त भाव’. हाच भावाच्या पुढच्या टप्प्याला जाण्याचा मार्ग आहे.