त्रास असणाऱ्या साधकांनो, त्रासामुळे पुनःपुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निराश होऊ नका !

‘त्रास असणार्‍या साधकांचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक आवरण सारखे सारखे येतच असते. त्यामुळे बर्‍याचदा अशा साधकांकडून ‘त्याच त्याच चुका पुनःपुन्हा होतात’, असे लक्षात आले आहे. चुका झाल्यावर त्याविषयी सतर्क होऊन चुका होऊ नयेत, यासाठी उपाययोजना काढूनही परत परत त्याच त्याच चुका झाल्यामुळे साधकांना निराशा येते. अशा चुका होण्यामागील मुख्य कारण ‘मन आणि बुद्धी यांवर … Read more

एखाद्या प्रसंगातील कार्यकारणभाव जाणून घेण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे !

बर्‍याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्‍लेषण आणि … Read more

कर्मनियंत्रणासाठी भगवंताशी सतत अनुसंधानित रहाण्याची आवश्यकता !

कर्म नियंत्रणात असेपर्यंत सुधारणा करणे शक्य असणे ‘एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील सत्य-असत्य आणि परिणाम जाणून कृत्य केले पाहिजे, उदा. अन्न घशातून आत जाण्यापूर्वी त्यावर आपले नियंत्रण पाहिजे. एकदा ते पोटात गेले की, त्यावरील आपले नियंत्रण संपते. बोलण्याचेसुद्धा असेच आहे. आपल्या मुखातून बोल निघेपर्यंत विचार करूनच बोलले पाहिजे. … Read more

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना श्रद्धा आणि सबुरी हवी !

काही जणांमध्ये मनाने करणे, अव्यवस्थितपणा, अनावश्यक बोलणे, अकारण मोठ्या आवाजात बोलणे यांसारखे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रबळ असतात. ते त्यांच्या प्रकृतीत इतके मुरलेेले असतात की, त्यांना त्यांची जाणीवही नसते आणि म्हणून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून त्यांवर मात करणे त्यांना इतरांच्या तुलनेत कठीण जाते. यामुळे त्यांना निराशा येते किंवा प्रक्रिया राबवणेच नको वाटते. … Read more

अखिल मानवजातीसाठी चिरंतन संजीवनी !

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ ही केवळ साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीला भवरोगातून मुक्त करणारी चिरंतन संजीवनी आहे.’

गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व

साधना करतांना गुरूंच्या आज्ञेने सर्व करत गेल्यास स्वतःचे मन आणि बुद्धी यांचा वापर न झाल्याने त्यांचा लय होतो. मनोलय आणि बुद्धीलय होतो. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत याला Disuse Atrophy (वापर न केल्यामुळे होणारा नाश) असे म्हणता येईल. यावरून गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येईल.