जिज्ञासेमुळे तळमळ निर्माण होऊन आत्मज्ञान प्राप्त होण्यास साहाय्य होणे

‘एखाद्या गोष्टीची जिज्ञासा असली, तरच ती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करतो. त्यातूनच तळमळ निर्माण होते. आत्मज्ञानासंदर्भात तळमळ असली, तरच साधकाकडून साधनेसाठी तीव्र प्रयत्न होतात आणि शेवटी त्याला आत्मज्ञान होते.’ – डॉ. आठवले (मार्गशीर्ष शुद्ध पक्ष ६, कलियुग वर्ष ५११४ (१८.१२.२०१२)

पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे अध्यात्म आहे म्हणजे काय ?

‘एखाद्याचे अक्षर सुंदर आहे, हे डोळ्यांना दिसते, ते मनाला आवडते. आवडण्याचे कारण ‘अक्षर सुंदर आहे’, हे बुद्धीला कळते. याउलट पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे गेलेल्यांना सूक्ष्मातील स्पंदने कळतात. त्यामुळे त्यांना संतांचे अक्षर चांगले नसले, त्यांनी वेड्यावाकड्या रेखाट्या ओढल्या, तरी त्यांत चैतन्य असल्याचे जाणवते; म्हणून ‘ते चांगले आहे’, असे ते म्हणतात.’ – डॉ. आठवले (२४.६.२००७)