सत्संगाचे महत्त्व

जेव्हा तांदुळ कुंकवासह असतात, तेव्हा ते अक्षता होऊन देवाच्या चरणी जातात. जेव्हा तांदुळ डाळीसह असतात, तेव्हा त्यांची खिचडी होते. सत्‌चा संग मिळाला, तरच आपण देवाच्या चरणांशी जाऊ शकतो. – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

एकरूपतेची प्रक्रिया !

‘एक थेंब पाणी समुद्रात टाकले, तर ते समुद्राशी एकरूप होते. तसा राष्ट्रभक्त राष्ट्राशी एकरूप होतो आणि साधक परमात्म्याशी एकरूप होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

व्यष्टी साधना

अ. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. आ. अहंमुळे तामसिकता वाढते. इ. परेच्छेने वागलो, तर अहं न्यून होतो. ई. मनात कृतज्ञताभाव असणे महत्त्वाचे आहे. – पू. (सौ.) संगीता जाधव

मनासारखे न झाल्यास दुःखी न होता साधकांनी ईश्वरेच्छा समजून घ्यायला हवी !

‘एखादी सेवा व्हायला पाहिजे’, असे आपण ठरवतो आणि मनासारखे झाले नाही की, आपल्याला दुःख होते अन् ‘देवाला अपेक्षित असे झाले नाही’, असे वाटते. आपण देवाचे नियोजन पहायला हवे.’ ‘परात्पर गुरुदेव सर्वशक्तीमान आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कठीण नाही. ते सर्वकाही देऊ शकतात; पण आपण त्यासाठी पात्रता निर्माण करणे आवश्यक आहे.’ – पू. (सौ.) संगीता जाधव

देव एका चौकटीत नसून सर्वत्र असल्याने त्याला चौकटीत न शोधता प्रत्येक स्थितीत अनुभवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक

‘देव इथेच भेटणार. तिथे नाही भेटणार. हे केले, तर देव भेटणार. हे केले नाही, तर भेटणार नाही’, असे काही नाही. देवाला कोणतीच चौकट नाही. आपण ‘देव हवा’; म्हणून साधना करतो; पण एक चौकट घालून तेथे देवाला शोधतो आणि ‘तो सापडत नाही’, असे म्हणतो. देव कोणत्याही चौकटीत नाही. ज्या परिस्थितीत देवाने ठेवले, त्यात देवाला शोधले की, … Read more

सेवा कशी करावी ?

अ. सेवा करतांना अहंचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू असते. अहंमुळे साधक सेवा करतांना मनाला वाटेल, तसे पालट करत असतो. यासाठी मनाचे न ऐकता उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करायला हवी. आ. सेवा करतांना सेवेत मन पूर्णपणे एकरूप केले, तरच मनाचे अर्पण होऊन मनाचे प्रारब्ध अल्प होणार आहे. त्यामुळे मानसिक त्रासही न्यून होणार आहेत. इ. साधकांनी सेवा … Read more

सेवा करण्याचे महत्त्व !

साधकांचे तन, मन आणि बुद्धी अर्पण व्हावी, यासाठी सेवा आहे. साधकांतील अहं न्यून होण्यासाठी गुरुसेवा करणे आवश्यक आहे. ‘आपली तळमळ वाढावी, आपले मन आणि बुद्धी शुद्ध व्हावी, तसेच अहंचे निर्मूलन व्हावे’, यासाठी गुरुदेवांनी सर्व सेवा निर्माण केल्या आहेत. – पू. (सौ.) संगीता जाधव

अध्यात्म स्वतः अनुभवल्याविना त्यातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही !

ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध घेतल्याविना त्याचा सुगंध कळत नाही, त्याचप्रमाणे साधना करून अध्यात्माचा अनुभव घेतल्याविना मनुष्याने त्याविषयी बोलू नये. ज्याप्रमाणे फुलातील सुगंधाचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे अध्यात्मातील चैतन्याचे शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचन क्र. १९२ (२९.१०.२०२१))

ईश्वराचे श्रेष्ठत्व जाणा !

मानवाने आतापर्यंत अनेक गोष्टींचा शोध लावला आहे; मात्र मानवाच्या लक्षात येत नाही की, त्याने शोध लावलेली प्रत्येक गोष्ट नीट चालण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाची आवश्यकता आहे. मानवाने आकाशयान (विमान) निर्माण केले; मात्र ‘आकाश ईश्वराने निर्माण केले आहे’, हे तो विसरतो. मानव म्हणतो, ‘मी विमान निर्माण केले.’ देव म्हणतो, ‘अरे मानवा, मी तुला निर्माण केले आहे !’ – … Read more

अंतरातील भावाचे महत्त्व

‘मंदिरांत ईश्वराची, देवतेच्या मूर्तीची पूजा होत असते. मूर्तीकडे पहाणाऱ्या व्यक्तीतील भावानुसार त्या त्या देवतेचे आशीर्वाद तिला मिळतात. शिल्पकाराने एखाद्या दगडाकडे पाहिल्यावर त्याला त्या दगडात देवाची मूर्ती दिसू लागते. ‘अमुक दगडापासून कोणत्या देवतेची मूर्ती सिद्ध होईल’, हे त्या शिल्पकाराच्या लगेच लक्षात येते. आपली दृष्टी एखाद्या दगडाकडे गेल्यास आपल्याला केवळ दगड दिसतो; मात्र शिल्पकारातील भावामुळे त्याला दगडात … Read more