भक्तीयोगाचे मह‌त्त्व !

‘ज्ञानयोगानुसार साधना केल्यास ती प्रामुख्याने बुद्धीने होते. कर्मयोगानुसार साधना केल्यास ती शरीर आणि बुद्धी यांनी होते, तर भक्तीयोगानुसार साधना केल्याने ती मन, बुद्धी आणि शरीर यांद्वारे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात. हे प्रयत्न केल्‍यामुळे आपली साधनेची तळमळ आणखी वाढते. असे चक्र चालू रहाते. यावरून आध्‍यात्मिक उन्‍नती होण्‍यासाठी साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व लक्षात … Read more

तक्रार नको, तर अंतर्मुख होऊन कारण शोधा !

‘अनेक जण ‘त्‍याची प्रगती होते; पण माझी प्रगती होत नाही’, अशी तक्रार करतात. खरे तर येथे ‘माझ्‍यामध्‍ये काय कमी आहे की, ज्‍यामुळे माझी प्रगती होत नाही ?’, याचा विचार करणे आवश्‍यक असते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.५.२०२३)

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना स्‍थुलापेक्षा सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा लाभ

‘जे साधक स्‍थुलातून माझ्‍याकडे पहातात, त्‍यांना मी काही घंटेच त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्‍याचा प्रयत्न करतात, त्‍यांना मी २४ घंटे त्‍यांच्‍या समवेत असल्‍याचे अनुभवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

ईश्वरी कायदे आणि जमाखर्च यांचे महत्त्व !

‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शिकण्याच्या वृत्तीचा लाभ !

‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेला आरंभ केल्‍यावर ईश्‍वराला जाणून घ्‍यायची जिज्ञासा असेल, तर प्रथम स्‍वतःला जाणा !

‘साधनेला आरंभ केला की, कुणालाही ईश्‍वराला पहायची, त्‍याला जाणून घ्‍यायची ओढ लागते; पण आपण स्‍वतः स्‍वभावदोष आणि अहंकार यांनी मलीन असतांना आपल्‍याला शुद्ध आणि पवित्र असा ईश्‍वर कसा भेटेल ! ईश्‍वराला जाणून घ्‍यायचे असेल, तर आधी अंतर्मुख होऊन स्‍वतःला जाणले पाहिजे. ‘आपल्‍यात कोणते स्‍वभावदोष आणि अहंचे कोणते पैलू आहेत ?, तसेच आपल्‍यात कोणते गुण वाढवणे … Read more

केवळ अध्‍यात्‍माचा अभ्‍यास नको, तर प्रत्‍यक्ष साधना करणे महत्त्वाचे !

‘अध्‍यात्‍माच्‍या अभ्‍यासाने केवळ अध्‍यात्‍माचे शाब्‍द़िक ज्ञान होते. थोडक्‍यात त्‍यामुळे केवळ पांडित्‍य येते. तेे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे कठीण असते. याउलट साधना केल्‍यास खर्‍या अर्थाने अध्‍यात्‍म जगणे होते. त्‍याने याच जन्‍मातही ईश्‍वरप्राप्‍ती करता येते.’ – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.५.२०२३)

ज्ञान आणि अज्ञान यांतील भेद

‘जे शाश्वताविषयी सांगते, ते सर्व ‘ज्ञान’ आहे. ज्याने ईश्वरप्राप्तीचा बोध होतो, ते ज्ञान आहे. जे मायेत अडकवते, जे अशाश्वताविषयी सांगते आणि जे अहंकार जोपासते ते ‘अज्ञान’ आहे.’ – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (१२.९.२०१७)