संताना राग येण्यामागील कारण !
‘सर्वसाधारण व्यक्ती रागावते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’ – (परात्पर गरु) आठवले
‘सर्वसाधारण व्यक्ती रागावते, ते तिला राग आला म्हणून. संत रागावतात ते साधक, शिष्य सुधारावा म्हणून !’ – (परात्पर गरु) आठवले
‘पंचज्ञानेंद्रिये नाक (गंध), जीभ (चव), डोळे (दृश्य), त्वचा (स्पर्श) आणि कान (ऐकणे) हे अनुभव घेतात; पण त्यातून मिळणारे सुख-दुःख मनालाच मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘ऋषी-मुनींनी सांगितलेले चुकीचे कसे ? हे सांगण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित विद्वान, हे लक्षात घेत नाहीत की, ऋषी-मुनींनी सांगितलेले सत्य चिरंतन आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न तथाकथित विद्वानांनी केला पाहिजे. त्यामुळे ‘मनूचे मत’ असे न म्हणता ‘मनूने सांगितलेले शास्त्र’ असे म्हटले पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘म्हातारपणी शरीर जर्जर होऊन कोणतीही हालचाल करतांना वेदना अनुभवयास येतात. त्या वेदनांमुळे आपोआपच तोंडातून ‘आई गं’ हा शब्द बाहेर पडतो ! लहान मुलाप्रमाणे म्हातारपणातही अशी आईची सतत आठवण काढणे, म्हणजे दुसरे बालपणच अनुभवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले
‘म्हातारपणात शरीर कोणत्याही स्तरावर साथ देत नसले की, अंथरुणावर खिळून रहावे लागते. अशा स्थितीत ना पैसा कमावण्याची इच्छा होते ना आयुष्यभर स्वकष्टाने कमावलेला पैसा ‘खाणे, पिणे आणि फिरणे’ यांसारख्या सुखांसाठी खर्च करण्याची इच्छा होते. अशा वेळी आयुष्यभर नको असलेला मृत्यूच हवा-हवासा वाटू लागतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्मदेहाने विश्वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !’ –सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘सांसारिक जीवनात सर्वांत अधिक सुख नवरा-बायको हेच एकमेकांना देतात. त्यामुळे मोठेपेणी ते स्वतःच्या आई-वडिलांना सांभाळण्याचे कर्तव्य सोडून स्वतंत्र रहातात आणि त्यांच्याकडे जातही नाहीत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे आजची मुले, तर कुठे वयाच्या ११ व्या वर्षी आत्मज्योतिज्ञान प्राप्त करणारे शंकराचार्य !’ -श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ