आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये !

बांबू उसासारखा दिसतो; मात्र आपण जसा ऊस खातो, तसा बांबू खाऊ शकत नाही. बांबू म्हणजे ‘नास्तिक’ आणि ऊस म्हणजे ‘आस्तिक’. देवावर श्रद्धा असणारे म्हणजे ‘मध’ आणि देवावर श्रद्धा नसणारे म्हणजे ‘साखर’. मध खाल्ल्याने रोग होत नाहीत. साखर अधिक खाल्ल्याने रोग होतात. या उदाहरणांतून असे लक्षात येते की, आस्तिक मनुष्याने नास्तिकाची संगत धरू नये ! – … Read more

अमृत आणि विष

अमृतको जहरका डर होता है । भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा ‘जहर’ म्हणजे विष घेतले, तर ‘आपण मरू कि काय’, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही. (संदर्भ : प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनचा ग्रंथ … Read more

विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

वरवरचे उपाय योजणारे शासनकर्ते !

‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना शासनकर्ते जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योग्य आचार-विचार !

दुसऱ्याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

मानवी जीवन

परमेश्वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. ‘इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही’, याची नेहमी काळजी घ्यावी. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे !

नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ? – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

खरा हितचिंतक !

‘अहो रूपम् अहो ध्वनिः ।’ म्हणजे ‘(गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे’, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

स्नेही सदाचारी असावा !

धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सकारात्मकतेतील शक्ती !

घडणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते. – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन