काही आल्हाददायक गोष्टी परिणामी मृत्यूला कारण ठरतात !

‘काही गोष्टी आल्हाददायक असतात; परंतु परिणामी घातक ठरतात. व्याध हरिणाला पकडण्याकरताच मधुर वाद्य वाजवतो. हरिणाला ते गाणे गोड वाटते; पण ते मृत्यूला कारण होते.’

पापी लोकांनी गंगा इत्यादी सात्त्विक नद्यांत, जलाशयांत आणि समुद्रात स्नान केल्याने त्यांतील पाणी रज-तमप्रधान होणे, ते प्रदूषण स्थुलातील प्रदूषणापेक्षा अधिक हानीकारक असणे; पण भारतातील अनभिज्ञ सरकार त्यासंदर्भात काहीच करत नसणे !

‘पुंडलिक यात्रा करत असतांना त्याला काशीपासून ३ मैल अलीकडे कुक्कुट ऋषींचा आश्रम दिसला. तेथे त्याने मुक्काम केला. तेथे त्याला रात्रीच्या वेळी वर्णाने काळ्याकुट्ट असलेल्या आणि मलीन वस्त्रे परिधान केलेल्या ३ स्त्रिया ऋषींच्या आश्रमात येतांना दिसल्या. त्यांनी रात्रभर ऋषींची सेवा केली आणि सकाळी सडासंमार्जन करून त्या परत जाऊ लागल्या. हे पाहून पुंडलिकाने त्यांना नमस्कार करून विचारले, … Read more

वासनाधीन असणा-यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असून ते त्यांच्या स्वार्थी वासनापूर्तीचे साधन असणे

‘वासनेचा ज्याला स्पर्श होत नाही, विकाराची सामग्री विनायास उपलब्ध असतांनाही, तो अविचल असतो, विकार ज्याच्या आसपासही भटकू शकत नाहीत, तोच (असे केवळ योगी वा संतच असू शकतात.) समाजाचे कल्याण करू शकतो. व्यक्ती आणि समाज यांना असेल तिथून वरच्या पायरीवर हमखास नेतोच नेतो. वासनाधीन असणार्‍यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असते. स्वतःच्या स्वार्थी वासनापूर्तीचे … Read more

परंपरांच्या विरोधात जाऊन समाजसुधारणा करणारे पुरोगामी आणि साम्यवादी पापाच्या पायावर उभे असणे

‘हे साम्यवादी आम्हा परपंरावाद्यांचा ‘जड, यांत्रिक आणि निर्जीव’ असा उपहास करतात. आम्हाला ‘कालप्रवाहाची उपेक्षा करणारे आहोत’, अशा शिव्याही हासडतात. खरे तर हे पुरोगामी, हे साम्यवादीच त्या अर्थाने परंपरावादी आहेत. स्वत:ला गोरगरिबांचे कैवारी म्हणवणारे वरकरणी कितीही समाजकल्याण आणि लोकहित यांच्या गोष्टी करू देत, योजना बनवू देत, ते सर्व पापाच्या पायावरच उभे आहेत.’

भाषाशुद्धीद्वारे चैतन्याचा प्रसार !

‘परकियांच्या आक्रमणांमुळे मराठी भाषेत अन्य भाषांतील शब्दांचा शिरकाव झाल्याने मराठी भाषेची तेजस्विता आणि तिचा प्रभाव उणावला होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य भाषांतील शब्दांच्या ठिकाणी मराठी शब्दांचा उपयोग करायला लावून मराठी भाषेतील शब्दांना महत्त्व दिले. मराठी भाषेत योग्य शब्दाला खूप महत्त्व आहे. त्याला अर्थ आहे आणि त्यामध्ये कार्य करणारी शक्ती आहे; म्हणून त्याला ‘शब्दब्रह्म’ म्हटले … Read more

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते,…

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार हे एक वेळ प्राण्यांचे वैशिष्ट्य असू शकते, माणसाचे नव्हे. धर्मबंधनात रहाणे, धर्मशास्त्रांचे अनुकरण, असे करणार्‍यांनाच माणूस म्हणता येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (४.११.२०१६)

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात…

हल्ली वृद्ध आई-वडिलांची काळजी त्यांची मुले घेत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. त्याचप्रमाणे शेतकरी वृद्ध झालेल्या गायी-बैलांना खाटिकखान्यात पाठवतात ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२५.१.२०१७)

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य…

बहुतेक संतांचे आणि संप्रदायांचे कार्य बुद्धीगम्य असते, तर सनातनचे कार्य बुद्धीअगम्य, म्हणजे बुद्धीपलिकडील, सूक्ष्म स्तरावरील असते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्लेषण करणे इत्यादी…

विज्ञानात प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे इत्यादी करून निष्कर्ष काढतात. याउलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले