अॅटम् बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब असलेल्या मानवाला हरवणारे कोरोना विषाणू !
‘कोरोना विषाणूमुळे ‘मानवाचा अहं किती क्षुल्लक आहे’, हे कळते.’
‘कोरोना विषाणूमुळे ‘मानवाचा अहं किती क्षुल्लक आहे’, हे कळते.’
कुटुंबातील आई-वडील, आजोबा, आजी यांची नावे २ – ३ पिढ्यांपर्यंतच कुटुंबाच्या लक्षात रहातात. समाजात वावरणार्या संतांची नावे २ -३ पिढ्यांपर्यंत समाजाच्या लक्षात रहातात. अभंग इत्यादी लिखाण करणार्या संतांची नावे काही शतके समाजाच्या लक्षात रहातात. ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग इत्यादींच्या संदर्भात लिखाण करणार्या ऋषींची नावे सहस्रो वर्षे लोकांच्या लक्षात असतात. याउलट आयुष्यभर अहंभावाने वागणार्या राजकारण्यांना लोक काही … Read more
‘ईश्वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणार्या ईश्वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’
निरागसता हे मनाचे, विवेकता हे बुद्धीचे आणि लीनता हे शुद्ध अहंचे (देहधारणेसाठी आवश्यक असलेल्या न्यूनातिन्यून अहंचे) सौंदर्य आहे.
‘पूर्वीच्या काळी असुर अमरत्वप्राप्तीसारख्या लोभापोटी तप करायचे, तर ऋषिमुनी सृष्टीच्या कल्याणासाठी तप करायचे. आज हिंदुस्थानातील अनेक जण स्वार्थापोटी भ्रष्टाचार करतात, स्वदेशात उच्च शिक्षण घेऊन देशातील गरिबी दूर करण्याऐवजी अधिक पैशांच्या हव्यासापोटी विदेशात नोकरी करतात आणि जल अन् वायू प्रदूषित करणारे कारखाने काढतात. अशासारखी दुष्प्रवृत्ती असणार्यांना कर्मफलन्यायानुसार फळ मिळणार, हे ठरलेले आहे. आज शासनकर्ते देशाच्या विकासासाठी … Read more
परिस्थिती प्रतिकूल असल्याची कारणे सांगणारा मनुष्य जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाही. याउलट प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी प्रयत्नशील असणारा मनुष्य जीवनात यशस्वी होतो !
‘लहान मुले आई-वडिलांकडून २ – ३ वर्षांतच मातृभाषा बोलायला शिकतात; पण मोठ्यांना दुसरी भाषा बोलायला शिकायला काही वर्षे द्यावी लागतात !’
‘काही गोष्टी आल्हाददायक असतात; परंतु परिणामी घातक ठरतात. व्याध हरिणाला पकडण्याकरताच मधुर वाद्य वाजवतो. हरिणाला ते गाणे गोड वाटते; पण ते मृत्यूला कारण होते.’
‘पुंडलिक यात्रा करत असतांना त्याला काशीपासून ३ मैल अलीकडे कुक्कुट ऋषींचा आश्रम दिसला. तेथे त्याने मुक्काम केला. तेथे त्याला रात्रीच्या वेळी वर्णाने काळ्याकुट्ट असलेल्या आणि मलीन वस्त्रे परिधान केलेल्या ३ स्त्रिया ऋषींच्या आश्रमात येतांना दिसल्या. त्यांनी रात्रभर ऋषींची सेवा केली आणि सकाळी सडासंमार्जन करून त्या परत जाऊ लागल्या. हे पाहून पुंडलिकाने त्यांना नमस्कार करून विचारले, … Read more
‘वासनेचा ज्याला स्पर्श होत नाही, विकाराची सामग्री विनायास उपलब्ध असतांनाही, तो अविचल असतो, विकार ज्याच्या आसपासही भटकू शकत नाहीत, तोच (असे केवळ योगी वा संतच असू शकतात.) समाजाचे कल्याण करू शकतो. व्यक्ती आणि समाज यांना असेल तिथून वरच्या पायरीवर हमखास नेतोच नेतो. वासनाधीन असणार्यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असते. स्वतःच्या स्वार्थी वासनापूर्तीचे … Read more