वक्त्याचे बोलणे आत्मविश्‍वासपूर्वक असण्याचे महत्त्व

‘संवादातून सुसंवाद साधण्याच्या हातोटीवर पुष्कळ लोकांनी जीवनात यश मिळवले आहे. अनेकांना विषयाचे भरपूर ज्ञान असूनही इतरांवर तेवढा प्रभाव पाडता येत नाही. उलट अधिक ज्ञान नसूनही काही लोक उत्तम प्रभाव पाडू शकतात. याला कारण म्हणजे ‘संभाषणचातुर्य’. जो आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतो, तोच लोकांची हृदये जिंकू शकतो. आत्मविश्‍वासपूर्वक केलेले छोटेसे संभाषणसुद्धा प्रभावी होऊ शकते. आपले प्रेमळ, सौम्य आणि कारुण्यपूर्ण शब्द आत्मविश्‍वासात वृद्धी करण्यास साहाय्य करतात. इतरांशी संभाषण करतांना आपल्या प्रत्येक शब्दातून आपला आत्मविश्‍वास प्रकट झाला पाहिजे, तरच आपण इतरांवर प्रभाव पाडून यश प्राप्त करू शकतो. थोडेच लोक मेंदूची भाषा समजू शकतात; पण हृदयापासून येणारी भाषा मात्र प्रत्येक व्यक्ती समजू शकते.’

– स्वामी विवेकानंद (संदर्भ : मासिक, ‘स्व’-रूपवर्धिनी कार्यवृत्त, २५.१.२०१३)

Leave a Comment