ऋषींचे सूक्ष्मातील कळण्याचे सामर्थ्य

आपण कानाला रिकामी बाटली, वाटी इत्यादी पोकळी असलेली वस्तू लावली, तर आपल्याला आकाशतत्त्वाचा नाद ऐकू येतो. आपल्याला खोलीच्या पोकळीतील नाद ऐकू येत नाही; मात्र ऋषींना आकाशाच्या पोकळीतील नाद ऐकू येतो. यावरून ऋषींची क्षमता केवढी होती, हे लक्षात येते. – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष नवमी, कलियुग वर्ष ५११५ (२.६.२०१३))

हिंदूंनो, विश्‍वाआधी स्वतःला सुसंस्कृत करा !

हिंदू नेहमी ऋग्वेदातील कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।, म्हणजे संपूर्ण विश्‍वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू असे अभिमानाने म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याचा आरंभ स्वतःपासूनच केला पाहिजे. कृण्वन्तो स्वम् आर्यम् ।, म्हणजे स्वतःला सुसंस्कृत करू, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकां सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥ अशी त्यांची स्थिती होणार नाही … Read more

हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता !

हिंदु धर्माचा अभ्यास आणि साधना नसल्याने हिंदूंना धर्माचे महत्त्व कळत नाही. त्यामुळे कोणी हिंदु राष्ट्राची स्थापना करा. हिंदु धर्माचा जगभर प्रसार करा, असे म्हणत नाही. आजार्‍याला औषधाचे महत्त्व कळते. औषधांहून हिंदु धर्म अनंत पटींनी श्रेष्ठ आहे. औषधे केवळ काही वेळा आजार बरा करतात; पण मृत्यूपासून सुटका करू शकत नाहीत. याउलट धर्म भवरोगातून, म्हणजे जन्म-मृत्यूच्या आजारातून … Read more

धर्मशिक्षण न देता, केवळ कायद्याने सुव्यवस्था आणू, असे म्हणणारे राज्यकर्ते मूर्खांच्या नंदनवनात रहात आहेत !

सत्ययुगात कायदेच नव्हते, म्हणजे त्यांची आवश्यकताच नव्हती; कारण प्रत्येक जण नीतीवान होता. त्रेतायुगात थोडेफार कायदे होते; पण त्यांची आवश्यकता फारच अल्प होती. द्वापरयुगापासून कलियुगापर्यंत कायद्यांची संख्या वाढत गेली आहे. प्रत्यक्षात कितीही कायदे केले आणि कायद्यांनुसार कितीही कडक शिक्षा केल्या, तरी त्यांचा गुन्हेगारांवर काहीही परिणाम होत नाही, हे पुनःपुन्हा तेच गुन्हे करणार्‍यांवरून सिद्ध झाले आहे. धर्मशिक्षणाच्या … Read more

हल्लीची हास्यास्पद शिक्षा पद्धत आणि सनातन संस्था सांगत असलेल्या साधना करण्याच्या शिक्षेचे महत्त्व

शिक्षा करण्याचा मूळ उद्देश असा असतो की, गुन्हेगाराने पुन्हा गुन्हा करण्यास धजावू नये. हल्लीच्या शिक्षा पद्धतीत हे अजिबात साध्य होत नाही. पुनः पुन्हा तेच तेच गुन्हे करून गुन्हेगार तुरूंगात जातात. एखाद्याला फाशी दिले, तरी त्याच्या मनातील गुन्हा करण्याचा संस्कार नष्ट होत नाही. तो पुढील जन्मात पुन्हा तसेच गुन्हे करतो. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभात मध्ये गुन्हेगार, … Read more

ख्रिस्ती बायबल वाटतात; म्हणून श्रीमद्भगवद्गीता वाटणारे हिंदू !

ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी बायबल वाटतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून काही हिंदू श्रीमद्भगवद्गीता वाटतात आणि अभिमानाने सांगतात, आम्ही गीतेच्या सहस्र प्रती समाजात वाटल्या. त्यांना हे कळत नाही की, बायबलमध्ये मानसिक स्तरावरची थोडीफार शिकवण आहे, तर गीतेत अत्युच्च स्तरावरची आध्यात्मिक शिकवण आहे. ती केवळ अभ्यासू किंवा चांगले साधक यांनाच कळू शकते. बहुसंख्य हिंदूंना गीता कळत नसल्यामुळे ते तिला कपाटात … Read more

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, धर्माची अद्वितीयता लक्षात घ्या !

धर्म अनादी असून युगेयुगे टिकतो. पंथ आणि संप्रदाय शेकडो वर्षे टिकतात, तर मानसिक स्तरावरच्या हिंदुत्ववादी संघटना आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे विचार ५० – ६० वर्षांतच मृतवत होतात. – डॉ. आठवले (२१.२.२०१४)

हिंदु धर्म

मधुमेह किंवा रक्तदाब असलेल्या रुग्णाला औषधे जितकी आवश्यक आहेत, तितकाचा मानवाला हिंदु धर्म आवश्यक आहे. त्याला विसरल्यामुळे हिंदूंची आणि मानवाची अवस्था मरणोन्मुख झाली आहे. – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, कलियुग वर्ष ५११५ (२१.६.२०१३))

हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सनातन प्रयत्‍नशील !

‘हिंदू धर्मांतर करतात; कारण हिंदूंमध्ये धर्माभिमान नाही. हिंदूंना धर्माभिमान नाही; कारण हिंदूंना धर्मशिक्षण नाही. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी सनातन प्रयत्‍नशील आहे. हिंदूंच्या दुःस्थितीच्या कारणाच्या मुळाशी जाऊन ते दूर करण्याचा प्रयत्‍न सनातन संस्था करते !’ – डॉ. आठवले (१६.३.२००७)

शिवसेनाप्रमुखांचे हिंदू राष्ट्र-स्थापनेचे विचार सत्यात आणून दाखवणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ! – प.पू. डॉ. जयंत आठवले, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान, ‘सनातन संस्था’

राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यासाठी जीवन वाहून घेण्याची समष्टी साधना करणारे महान कर्मयोगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ! ‘मी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘आंतरमहाविद्यालयीन मराठी वाङ्मय मंडळा’ची स्थापना केली. तेव्हा शिवसेनेची ‘विद्यार्थी सेना’ नुकतीच कार्यरत होत होती. तेव्हा कुमार कदम इत्यादी ‘विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांबरोबर माझी जवळीक झाली. तेव्हापासून शिवसेनेबद्दल माझ्या मनात जवळीक निर्माण झाली. ती किती … Read more