स्वकर्मत्यागाने सर्वांची अधोगती !

अमेरिका आणि युरोप येथे पूर्वी संसार आणि मातृपद हा धर्म होता; परंतु सुधारलेल्या पश्चिमेत त्या स्त्रियांना स्वधर्म न पाळता आल्यामुळे त्यांना सर्व आधीव्याधींनी पछाडले. अशा तऱ्हेचा कर्मत्यागरूप वर्णसंकर जगभर वणव्यासारखा पसरला. त्यामुळे अर्थ-कामावर व्यक्तीची दृष्टी खिळली. मग ‘वंशसंकर फैलावला. विद्यादानाची शक्ती नसलेले शिक्षक पैशाकरिता ज्ञानदान करीत आहेत. प्रजा रक्षणाकरिता नेमलेले अधिकारी प्रजा भक्षक झाले आहेत. … Read more

औद्योगिक संस्कृतीचा भस्मासूर

आज औद्योगिक संस्कृतीने भयंकर धुमाकूळ घातला आहे. यंत्रांची इतकी बेसुमार वाढ झालेली आहे की, ही यंत्रे बाजूला सारली नाहीत, तर तीच आपल्याला खाऊन टाकतील. Stop machines, otherwise they will stop you ! या औद्योगिक संस्कृतीने कसा धुमाकूळ घातला आहे पहा. संपूर्ण पृथ्वीच या कंपन्यांच्या मालकीची झाली आहे. कडुलिंबाचे, बासमती तांदुळाचे पेटंटच नव्हे, तर बौद्धिक स्वामित्व … Read more

अंधश्रद्धा नाही, तर अंधविश्‍वास हा शब्द योग्य आहे, हेही ज्ञात नसलेले अंनिसवाले !

विश्‍वास हा शब्दांच्या, बुद्धीच्या स्तरावरचा असल्याने तो एकवेळ अंध असू शकतो; पण श्रद्धा ही अनुभूतीच्या स्तरावरील असल्याने कधीच अंध नसते. – डॉ. आठवले (१४.४.२०१४)

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनो, हे लक्षात घ्या !

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची, समाजाची आणि राष्ट्राची हानी कशी होते, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल. १. व्यक्तीस्वातंत्र्यवाले प्राण्यांप्रमाणे स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, त्यामुळे ते मनुष्यजन्म वाया घालवतात. २. व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे वागणे स्वकेंद्रित असते. ते इतरांची पर्वा करत नाहीत. यामुळे त्यांचा अहंभाव वाढतो. जितका अहंभाव कमी, तितकी सच्चिदानंदाची अनुभूती अधिक अधिक येते, हे त्यांना … Read more

हिंदूंनी धर्माचरण न केल्यास त्यांना इतर पंथियांपेक्षा (धर्मियांपेक्षा) अधिक शिक्षा भोगावी लागणे !

हिंदूंनी धर्माचरण केले नाही, साधना केली नाही, तर त्यांना इतर पंथियांपेक्षा (धर्मियांपेक्षा) अधिक शिक्षा भोगावी लागते; कारण खरा धर्म ज्ञात असूनही त्यांनी त्याचे पालन केलेले नसते. इतर पंथियांना धर्म म्हणजे काय ? हेच ज्ञात नसल्याने त्यांच्याकडून अज्ञानापोटी ज्या चुका होतात, त्यासाठी त्यांना हिंदूंपेक्षा अल्प शिक्षा भोगावी लागते. देशातील नियम ज्ञात असूनही त्याचे पालन न केल्यास … Read more

व्यक्तीस्वातंत्र्यामुळे होणारी हानी

१. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे व्यक्तीची (व्यष्टीची) होणारी धूळधाण ! : व्यक्तीस्वातंत्र्यामुळे सुखलोलुपता, स्वैराचार इत्यादी सर्व वाढतात आणि इच्छा पूर्ण न झाल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक दुःखी होते. याउलट सर्वस्वाचा त्याग आणि साधना करणार्‍यांना तात्कालिक सुख नाही, तर चिरंतन आनंदाची, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होते. २. व्यक्तीस्वातंत्र्यामुळे राष्ट्राची (समष्टीची) झालेली वाताहत ! : व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र मोठे, हे न … Read more

कुठे पाश्‍चात्त्य विवाह तर कुठे हिंदू विवाह !

१. पाश्‍चात्त्य विवाह : हा केवळ शारीरिक स्तरावरचा असतो; म्हणून त्यामुळे पती-पत्नीला एकमेकाचा मानसिक आधार मिळत नाही. त्यामुळे मनावर ताण येऊन त्यांना मनोविकारतज्ञांकडे जावे लागते. २. हिंदु विवाह : हा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर आधार देणारा आहे. आध्यात्मिक स्तरावर दोघांनी एकमेकांना साहाय्य करून सप्तलोक पार करून मोक्षाला जायचे असते. यासाठीच सप्तपदी असते.- … Read more

खरा विकास कशाला म्हणतात, हेही माहित नसलेले राजकारणी !

निवडणुका आल्या की, सर्वच राजकीय पक्ष अन्न, पाणी, शिक्षण, घर इत्यादींसंदर्भात मोठमोठी आश्‍वासने देतात आणि विकास करू या शब्दाचा भूलभुलैया दाखवतात. सर्वसामान्य जनताच नाही, तर सुशिक्षितही त्याला भुलतात. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ६६ वर्षांत जनता देशोधडीला गेली आहे. जनतेला भौतिक, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व तर्‍हेच्या समस्या भेडसावत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जनतेला साधनेला लावले असते, … Read more

ज्वलंत राष्ट्राभिमानी सनातन संस्था यांना राजकीय पक्षांचा आणि शासनाचा विरोध होणे

ज्वलंत राष्ट्राभिमानी स्वा. सावरकरांना यांना जसा राजकीय पक्षांनी आणि शासनांनी विरोध केला, तसा विरोध सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांना होत आहे, यात आश्‍चर्य ते काय ? उलट तो विरोध म्हणजे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृति समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रेमाचे ते प्रमाणपत्र आहे ! – डॉ. आठवले (ज्येष्ठ शुक्ल पक्ष १३, … Read more

ऋषींचे सूक्ष्मातील कळण्याचे सामर्थ्य

आपण कानाला रिकामी बाटली, वाटी इत्यादी पोकळी असलेली वस्तू लावली, तर आपल्याला आकाशतत्त्वाचा नाद ऐकू येतो. आपल्याला खोलीच्या पोकळीतील नाद ऐकू येत नाही; मात्र ऋषींना आकाशाच्या पोकळीतील नाद ऐकू येतो. यावरून ऋषींची क्षमता केवढी होती, हे लक्षात येते. – डॉ. आठवले (वैशाख कृष्ण पक्ष नवमी, कलियुग वर्ष ५११५ (२.६.२०१३))