स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना श्रद्धा आणि सबुरी हवी !

काही जणांमध्ये मनाने करणे, अव्यवस्थितपणा, अनावश्यक बोलणे, अकारण मोठ्या आवाजात बोलणे यांसारखे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रबळ असतात. ते त्यांच्या प्रकृतीत इतके मुरलेेले असतात की, त्यांना त्यांची जाणीवही नसते आणि म्हणून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून त्यांवर मात करणे त्यांना इतरांच्या तुलनेत कठीण जाते. यामुळे त्यांना निराशा येते किंवा प्रक्रिया राबवणेच नको वाटते. … Read more

खरे अध्यात्म कळणे, म्हणजे काय ?

बर्‍याच जणांना आध्यात्मिक ग्रंथ वाचले किंवा कीर्तने वा अध्यात्मावरील प्रवचने ऐकली की, आपल्याला अध्यात्म कळले, असे वाटते. हे खरे अध्यात्म कळणे नव्हे; कारण हे केवळ शब्दांच्या पातळीला असते. अध्यात्मातील ज्ञान जेव्हा आपण जीवनात अनुभवू लागतो, तेव्हा अध्यात्माचा अर्थ आपल्याला खर्‍या अर्थाने कळायला लागतो. हे खरे अध्यात्म कळणे होय. खरे अध्यात्म कळण्यासाठी साधनाच करावी लागते.

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे खरे गो-पालक राज्यकर्ते हवेत !

‘छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या १२ व्या वर्षी विजापूरला शहाजीराजांकडे गेले असतांना रस्त्यात गायीची हत्या होत असलेली पाहून त्यांनी त्वरित गायीवर घाव घालत असलेल्या कसायाचा हात वरच्या वर छाटून टाकला. यामुळेच शिवाजी महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक राजा’ असे संबोधतात. ‘आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान आहे’, असे आज राज्यकर्ते सांगतात; मग संपूर्ण देशभरात ‘गोहत्याबंदी कायदा’ आणण्यासाठी ते का झटत नाहीत … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शत्रूंवर जरब बसवणारे शासनकर्ते हवेत !

‘आपण आतापर्यंत पाकिस्तानबरोबरची सर्व युद्धे जिंकली, तरी आज पाक जिहादी हे आतंकवाद, बनावट चलन आदी माध्यमांतून आपल्याशी युद्ध करतच आहे. बांगलादेशाला स्वतंत्र आपण केले, तरी आज बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. आपल्या शेजारच्या राष्ट्रांवर आपण जरब न बसवल्याचाच हा परिणाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली होती की, महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या … Read more

नीतीशून्य आणि संस्कृतीद्रोही दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपट !

सध्याच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवरील बर्‍याच कार्यक्रमांत, तसेच चित्रपटांतही कौटुंबिक कलह, एकमेकांविषयी ईर्षा आणि सूडभावना, स्वतःची पत्नी असतांनाही परस्त्रीसह प्रेमसंबंध इत्यादी दाखवले जाते. अशा नीतीशून्य, अविवेकी आणि संस्कृतीद्रोही कार्यक्रमांचा परिणाम मोठ्यांसह लहानांवरही होतो. याला कारणीभूत असणार्‍या दूरचित्रवाहिन्या, चित्रपट-निर्माते आदींसह घराघरांत असे कार्यक्रम पहाणारे आणि लहानांनाही ते पाहू देणारे स्वतःच्याच हाताने स्वतःचे पाप वाढवत असून राष्ट्रालाही अधःपतित करत … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे अभेद्य संघटन उभे करत असणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परकीय आक्रमकांनी हिंदुस्थानवर आक्रमणे केली, तेव्हा काही अपवाद वगळता अन्य वेळी तत्कालीन हिंदु राजे, संस्थानिक, सरदार आदींमध्ये एकीचा अभाव दिसला. यामुळेच आक्रमकांना दीर्घकाळ हिंदुस्थानवर राज्य करता आले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंचे अभेद्य संघटन निर्माण व्हायला हवे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सद्यस्थितीत हिंदु अधिवेशनांसारख्या माध्यमांतून हिंदूंचे अभेद्य संघटन करत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले … Read more

आपण जीवनात जितका मोठा संघर्ष करू, तितके ध्येयाच्या अधिक जवळ जाऊ !

हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अनेकविध संकटांचा सामना करावा लागला, हे सर्वज्ञातच आहे. लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोसलेले हाल तर पुष्कळच आहेत. आर्थिक अडचणींमुळे लहानपणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाल्याचे काम आणि सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवण्याचे कामही करावे लागले होते. या सर्व मंडळींनी … Read more

भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराश होऊ नका, तर कर्म आणि ज्ञान या साधनामार्गांनुसार प्रयत्न करा !

‘काही साधकांना सतत भावाच्या अनुसंधानात रहाणे, देवाशी बोलणे इत्यादी भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराशा येते. भक्तीमार्गी साधकाला हे प्रयत्न चांगले जमतात; पण कर्ममार्गी आणि ज्ञानमार्गी साधकाला ते भक्तीमार्गी साधकाप्रमाणे जमू शकणार नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुकृपायोगात भक्ती, कर्म आणि ज्ञान या … Read more

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व

‘कोणतीही कृती परिपूर्ण केली, तर ती एकप्रकारे साधनाच होते’, हा कर्मसिद्धांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवला आहे. सेवा भावपूर्ण केली, तरच ती परिपूर्ण होऊ शकते. अशी सेवा केल्याने आपण गुरूंचे मन लवकर जिंकू शकतो. गुरूंचे मन जिंकले की, गुरुकृपा लवकर होऊन अध्यात्मात शीघ्र प्रगती होते. परिपूर्ण सेवा केल्याने साधक अव्यक्त भावाच्या टप्प्याला लवकर … Read more

देवतांचा आदर्श ठेवून संकटांना पुरून उरूया !

‘शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी देवी सतीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रभु श्रीरामाला १४ वर्षे खडतर वनवास भोगावा लागला. बालपणातच श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी कंसाने आणि हनुमानाचा वध करण्यासाठी रावणाने अनेक असुरांना त्यांच्यावर धाडले. संकटे तर देवतांनाही चुकली नाहीत; पण देवता या सार्‍या संकटांना पुरून उरल्या. संकटांतच आपली श्रद्धा, धैर्य, संयम आणि विवेक यांची खरी परीक्षा … Read more