‘कोणतीही कृती परिपूर्ण केली, तर ती एकप्रकारे साधनाच होते’, हा कर्मसिद्धांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवला आहे. सेवा भावपूर्ण केली, तरच ती परिपूर्ण होऊ शकते. अशी सेवा केल्याने आपण गुरूंचे मन लवकर जिंकू शकतो. गुरूंचे मन जिंकले की, गुरुकृपा लवकर होऊन अध्यात्मात शीघ्र प्रगती होते.
परिपूर्ण सेवा केल्याने साधक अव्यक्त भावाच्या टप्प्याला लवकर जाऊ शकतो. साधकात व्यक्त भाव जरी असला, तरी अव्यक्त भाव निर्माण झाल्याविना ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही; म्हणून साधकांनी भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१६.३.२०१७)
खरे देवदर्शन !
देहत्याग केल्यावरही साधना होण्यासाठी आताच मनावर साधनेचा संस्कार करा !
व्यक्तीपूजेपेक्षा साधनेला महत्त्व !
नकारात्मक न बोलण्याचे लाभ
‘मी’ नष्ट झाला की भगवंत प्रकटतो !