पोलीसखाते आणि प्रशासन यांची झालेली दुःस्थिती !

‘सध्याचे पोलीसखाते आणि प्रशासन यांची दुःस्थिती पहाता पुढील काळात ‘भ्रष्टाचार न करणारा १ तरी पोलीस आणि सरकारी अधिकारी दाखवा आणि इनाम मिळवा !’, अशी जाहिरात आल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भारतात गुन्ह्यांची नोंद अल्प प्रमाणात होण्याचे कारण

‘बहुतेक जण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला जात नाहीत; कारण त्यांना ठाऊक असते की, तेथे वेळ फुकट जाऊन कधीकधी पोलिसांच्या उद्धटपणामुळे अपमान सहन करावा लागेल आणि शेवटी फलनिष्पत्ती काहीच मिळणार नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातनचे कार्य प्रत्येक जिज्ञासूच्या उद्धारासाठी असणे !

‘भगवान त्याच्या केवळ एका भक्तासाठीही अवतार घेतो. याच तत्त्वाने सनातनचे कार्य चालू आहे, उदा. सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला एखाद्या ठिकाणी चांगला प्रतिसाद नसला, तरी त्या भागातील एका जिज्ञासूसाठी तेथे कार्य केले जाते. त्या एका जिज्ञासूची आध्यात्मिक प्रगती होणे महत्त्वाचे आहे. एखादा ग्रंथ प्रकाशित केल्यावर त्याची खूप विक्री झाली नाही, तरी चालेल; पण ‘ज्या जिज्ञासूला तो आवश्यक … Read more

आता केवळ रामराज्य हवे !

‘भारतातील लोकशाहीचा स्वातंत्र्योत्तर ७४ वर्षांचा इतिहास पहाता ‘आता राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी कोणत्याही भ्रष्ट आणि दुराचारी राजकीय पक्षाचे राज्य नको, तर केवळ रामराज्य हवे’, असे वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

‘ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो. अन्य साधनामार्गांमध्ये ‘सांगितलेले केवळ कृतीत आणणे’, इतकेच असते. त्यात प्रारंभापासूनच बुद्धी कार्यरत नसते. त्यामुळे बुद्धीलय लवकर होतो. यामुळेच ज्ञानयोगाच्या तुलनेत अन्य साधनामार्गांमध्ये आध्यात्मिक प्रगती जलद होते.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले (४.१.२०२२)

अनुभूती विकत घेता येत नाही, तर त्यासाठी पात्र व्हावे लागते !

‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. आपण ज्या प्रमाणात किंवा ज्या टप्प्याची साधना (कृती) करू, त्या टप्प्याचे अध्यात्माचे विविध पैलू अनुभूतींच्या माध्यमातून लक्षात येऊ लागतात. प्रत्येक टप्प्याची अनुभूती येण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात साधना करून त्यासाठी सक्षम (पात्र) असणेही आवश्यक असते. कुणालाही पैसे देऊन अनुभूती विकत घेणे शक्य नसते. दुसरे म्हणजे एखाद्याने पात्रता नसतांना ती घेण्याचा प्रयत्न … Read more

निवडणुका हा पोरखेळ झाला आहे

‘निवडणुकीसंदर्भात प्रतिदिन येणार्‍या बातम्या वाचून वाटते, ‘आता निवडणुका हा पोरखेळ झाला आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राजकीय पक्ष आणि साधक यांच्यातील भेद !

‘तत्त्वशून्य राजकीय पक्ष जनतेला खूश करून निवडून येण्यासाठी काहीही करतात, तर साधक केवळ ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रयत्न करायला सिद्ध असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधना केल्याने आयुष्यभर आनंद मिळतो !

‘जेवतांना आवडीचे पदार्थ खातांना थोडा वेळ सुख मिळते. वासनेचे सुखही काही तासच टिकते. याउलट साधना करणार्‍याला आयुष्यभर आनंद मिळतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०२१)

लोकांच्या प्रारब्धानुरूप समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना, म्हणजे त्यांना साधना न शिकवता केवळ वरवरची उपाययोजना काढणारे संत !

‘बरेच संत त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या अडचणी सोडवण्यावर भर देतात. वस्तुतः या सर्व समस्या व्यक्तीच्या प्रारब्धानुसार किंवा त्याला असणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत असतात. त्यावर मूळ उपायोजना म्हणजे संबंधितांनी साधना करणे. संतांनी स्वतःची साधना खर्च करून त्यांच्या भक्तांच्या अडचणी दूर केल्या, तर तो भक्त परावलंबी होतो आणि प्रारब्धभोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माला … Read more