कार्यपूर्तीसंदर्भात प्रयत्न आणि यज्ञयाग यांचे महत्त्व

‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२.२.२०२२)

तिस-या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्लोक ३१ अर्थ : माझा भक्त नाश पावत नाही. भक्ताला, साधना करणार्‍यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्‍या महायुद्धात वाचवील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘आदर्श समाज’ दाखवा !

‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्‍या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कठोर साधनेचे महत्त्व !

‘संत बहिणाबाईंनी ‘अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, तेव्हां मिळते भाकर !’ हे जे व्यावहारिक जीवनाबद्दल सांगितले आहे, ते आध्यात्मिक जीवनालाही लागू पडते – ‘अरे साधना साधना, जसा तवा चुल्ह्यावर । आधी हाताला चटके, मग मिळतो ईश्वर ।’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१.२०२२)

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म अन् मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

भारताच्या तथाकथित ‘सुधारणावादा’मुळे आध्यात्मिक क्षेत्रात होणारी हानी !

‘स्वातंत्र्योत्तर काळात समाजधुरिणांनी समाजाला ‘अध्यात्म आणि साधना’ हे विषय शिकवलेच नाहीत. तथाकथित ‘सुधारणावादा’च्या नावाखाली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लोकशाहीत कायदे सिद्ध करतांनाही याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आता एखादा लहान मुलगा त्यांच्या पूर्वजन्मीच्या साधनेच्या संस्कारामुळे या जन्मात साधना म्हणून सेवा करू लागल्यास त्याचे कौतुक होत नाही, उलट त्याच्यावर टीका होऊन तो सात्त्विक जीवही साधना … Read more

आपले आयुष्य आपल्याच हातात !

‘अनेक शारीरिक आजार हे शरिराच्या प्राणशक्तीमध्ये अडथळे आल्यामुळे निर्माण झालेले असतात. प्राणशक्तीमधील हे अडथळे विविध न्यास, मुद्रा आणि त्यांच्या जोडीला योग्य त्या देवतेचा नामजप यांनी दूर करता येतात. ही बिनखर्चिक उपचारपद्धती आत्मसात केल्यास ‘आपले आयुष्य आपल्याच हातात असते’, याची अनुभूती येते. अनेक आजारांसाठी औषधोपचारासह या पद्धतीने उपचार केल्यास अल्पावधीत आजार बरे होतात. सनातनचे अनेक साधक … Read more

मानसिक नव्हे, तर केवळ शारीरिक प्रेम असणारे हल्लीचे पती-पत्नी !

‘हल्लीच्या काळातील स्त्री-पुरुषांमधील प्रेम बहुदा केवळ शारीरिक प्रेम असते. त्यामुळे त्यांना लग्न करायचीही आवश्यकता वाटत नाही आणि त्यांनी लग्न केले, तर ते टिकत नाही. त्यांचे एकमेकांशी पटले नाही, तर ते मानसिक प्रेम नसल्याने जोडीदार बदलत रहातात. लग्न केलेले असल्यास अल्पावधीच घटस्फोट होऊन ते वेगळे होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (८.२.२०२२)