भगवंताची वाणी दुसर्याला सांगतांना प्रत्येकाने त्यात स्वतःचे मत मिसळल्याने ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाणे, तर केवळ संतच मूळ सत्य स्वरूपाचे ज्ञान जसेच्या तसे कथन करू शकणे
‘भगवंताची वाणी एकाने दुसर्याला सांगतांना (परिवर्तित करतांना) त्यामध्ये प्रत्येक जण स्वतःचे मत मिसळत असतो. त्यामुळे ज्ञानाचे मूळ स्वरूप झाकले जाते. रज-तमाचे आवरण वाढून ते परिवर्तित होते. यामुळे धर्मग्लानी आली आहे. सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रयोग करतात. एका ओळीत २५ सैनिक उभे करतात. पहिला सैनिक एक गुप्त वार्ता दुसर्याच्या कानात सांगून, ती वार्ता जशीच्या तशी पुढील … Read more