चैतन्याचा प्रसार करा !

सध्या आधुनिक कृत्रिम अशुद्ध धाग्यांनी बनलेले असात्त्विक कपडे वापरल्याने रज-तमाचा प्रसार होत आहे. एवढेच नव्हे, तर कपड्यांवरील नक्षीकामही अनिष्ट शक्तींनी भारलेले असते. साहजिकच त्यांतून रज-तमाचा प्रभाव वाढतो. यासाठी सात्त्विक वेशभूषा केली पाहिजे. सध्या आवडी-निवडीचा प्रसार केला जातो. माल विकला जावा, यासाठी दुकानदार त्याचे विज्ञापन करतो आणि आपण त्या प्रलोभनाला बळी पडून स्वतःचे पैसे व्यय करून … Read more

राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांनी समाजाची दुःस्थिती पाहून निराश न होता तन-मन-धनाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या महान कार्यात सहभागी व्हावे !

सध्या दूरचित्रवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून समाजाची बिकट स्थिती लक्षात येते. समाजात देवता आणि महापुरुष यांचे विडंबन, आर्थिक घोटाळे, बलात्कार इत्यादी समाज, राष्ट्र आणि धर्म यांवर घाला घालणारे प्रसंग घडत आहेत. अशा वेळी राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना आपण त्यासाठी काहीतरी केले पाहिजे आणि ही स्थिती पालटायला पाहिजे, असे वाटते; पण नेमकेपणाने त्यासाठी काय करायला … Read more

हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत असल्याने सात्त्विकतेचा ऱ्हास होत आहे !

आपण असत्याला सत्य समजतो. समजण्यात भेद झाला, तर विचारांत भेद होतो. विचारांत भेद झाला, तर कार्यात भेद होतो. आपण गणपति उत्सव हा समष्टी पूजा म्हणून करतो; पण तोही विकृत स्वरूपात साजरा होतांना दिसून येतो. पूजेचा योग्य अर्थ न समजल्यामुळे असे झाले आहे. हिंदूंच्या उत्सवात अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत आहे. त्यामुळे सात्त्विकतेचा र्‍हास होत आहे. खर्‍या … Read more

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

सध्याचे मराठी साहित्य संमेलन हे अगदी खालच्या स्तरावर चालू आहे. त्यामुळे साहित्याची अधोगती होत आहे. हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. साहित्य हे समाज आणि परिस्थिती यांचे दर्शन घडवते. ॐकाराला ब्रह्म म्हटले आहे. ॐकाराद्वारे शब्दांची निर्मिती झाली आहे. या शब्दसामर्थ्यामुळे मानवाला ज्ञान प्राप्त होत आहे. शब्दामध्ये सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य साधनेमुळे निर्माण होते; म्हणूनच ऋषिमुनींनी निर्माण … Read more

संयम ठेवून चांगले वागल्यासच प्रगती शक्य !

ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम् ॥ – ईशावास्योपनिषद, मंत्र १ अर्थ : या जगातील प्रत्येक अणू-रेणूमध्ये ईश्‍वराचे अस्तित्व आहे. तेव्हा त्यागी वृत्ती (संयम) ठेवून जगाचा उपभोग घे. (आपल्या उन्नतीसाठी (प्रभुकार्यासाठी) कार्य कर); परंतु त्याच वेळी कुणाच्या धनाची अभिलाषा बाळगू नकोस. सध्या ‘बहिर्मुख राहून तसे वागल्याने आणि भगवंताने दिलेली … Read more

त्याग आणि संयम यांचे महत्त्व

‘वाईट गोष्टींचा प्रभाव वाढल्यावर सज्जन एकत्र येतात. सत्त्वगुणी लोकांची एकजूट होण्यासाठी वाईट लोक हे कारण आहे. एकत्रीकरणासाठी वाईट गोष्टी समोर येणे आवश्यक आहे. त्या आल्यावर दोघांचे युद्ध आणि संघर्ष चालू असतो. ‘हे भगवंताचे नियोजन आहे’, हे समजणे कठीण आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीतील सात्त्विकता गेल्यावर तिच्यात रज-तमात्मक बाजू निर्माण होते. एखाद्या … Read more

रज-तमात्मक गोष्टींना विरोध करून सात्त्विकतेला प्राधान्य द्या !

व्यापारी लोक लाभासाठी चिनी आणि रज-तमात्मक साहित्याची विक्री करतात. या मनोवृत्ती पालटल्या पाहिजेत. जे रज-तमात्मक गोष्टींना प्राधान्य देतात, त्यांना विरोध करून सात्त्विकतेला प्राधान्य देणे, हे आपले कार्य आहे.

साधकांनो, ‘चैतन्याद्वारेच कार्य होते’, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी सिद्ध व्हा !

‘स्वतः दृढ निश्‍चय करून उठल्यासच कार्य होते. दुसर्‍याकडून अपेक्षा करून ते होत नाही. स्वतःवरील आवरण काढले, तरच चैतन्य दिसेल आणि चैतन्यात इतके सामर्थ्य असते की, तेच कार्य करतांना दिसून येते. अशा रितीने जेव्हा मोठ्या संख्येने साधक सिद्ध होऊन कार्यरत होतात, तेव्हा दावाग्नी पेटून रज-तमात्मक अशा वातावरणातील अनिष्ट शक्तींचे निर्मूलन सहज-सुलभ रितीने होते. अशा प्रकारे हिंदु … Read more

नामस्मरण म्हणजे काय ?

अ. ‘मी जिवंत आहे. माझा प्रत्येक क्षण भगवंताच्या अनुसंधानात आहे’, हा विचार सतत असणे, हे खरे जीवन आहे. याला ‘नामस्मरण’ म्हणतात. आ. भगवंताच्या स्मरणात घडलेले प्रत्येक कर्म, म्हणजे नामस्मरण !’