परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘देव भूमी, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’
‘आपत्काळात सर्वसाधारण व्यक्तीला कुटुंबियांची काळजी वाटते; पण तेव्हा साधनेत प्रगती केलेल्या साधकांना साधकांची, म्हणजे ईश्वराच्या कुटुंबाची, म्हणजे त्याच्या भक्तांची काळजी वाटते. साधनेत अधिक प्रगती केलेल्यांना ती काळजीही वाटत नाही; कारण ‘ईश्वर करतो, ते भल्यासाठी’ यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असते.’
‘अनेक राजे-महाराजांपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे मूल्य सर्वाधिक वाटते; कारण मूठभर मावळ्यांनिशी पाच बलाढ्य परकीय पातशाह्यांशी केलेल्या संघर्षात ते विजयी ठरले. याप्रमाणेच साधनेतील अडथळ्यांविना होणाऱ्या आध्यात्मिक प्रगतीपेक्षा साधनेतील अडथळ्यांवर संघर्षपूर्वक मात केल्याने होणाऱ्या प्रगतीचे मूल्य सर्वाधिक आहे.’
‘चेन्नई येथील उच्च न्यायालयाने आजच्या तरुण पिढीविषयी खेद व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘चित्रपटातील अश्लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या मनामध्ये दुष्ट विचार येतात आणि त्यात हिंसाचाराच्या घटना दाखवल्यामुळे तरुण पिढीची मने बिघडली आहेत. यासाठी चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वतःचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासावी.’
‘कोणावरही साधनेची सक्ती करता येत नाही. साधनेची ओढ अंतर्मनातून यायला हवी. त्यासाठी अध्यात्माचा आणि साधनेचा अभ्यास केल्यास साहाय्य होते.’
आपण आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे इतरांच्या लक्षात रहात नाही, तर साधनेच्या चैतन्यामुळे लक्षात रहातो !
‘सनातनचा आश्रम पहायला येणारे काही जण विचारतात, ‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’ या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करू इच्छिणारे आश्रमात राहू शकतात.’
‘प्रकाशाची गती, ग्रह-तार्यांचे एकमेकांपासूनचे अंतर इत्यादी अनेक शोध हिंदूंच्या ऋषिमुनींनी पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या सहस्रो वर्षे पूर्वीच लावले आहेत. पाश्चात्त्यांकडे असतात तशा अत्याधुनिक उपकरणांविना ऋषिमुनी हे शोध लावू शकले, ते त्यांच्या साधनेमुळे प्रगट झालेल्या अंतर्ज्ञानाच्या (ईश्वरी ज्ञानाच्या) बळावर ! आजच्या विज्ञानयुगातील पिढीने याचा अंतर्मुखतेने विचार करून साधना केली, तर तिला लौकिक जीवनातील यशप्राप्ती होण्यास साहाय्य होऊन पारमार्थिक … Read more