परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या साधनेमुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांच्यातील आत्मचैतन्याचे बळ वाढणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगांतर्गत अष्टांग योगानुसार साधना सांगितली आहे. या माध्यमातून साधकांची स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी निरनिराळ्या सत्संगांच्या माध्यमांतून (आढावा सत्संग, स्वभावदोष निर्मूलन सत्संग इत्यादी) ते प्रयत्न करून घेत आहेत. बर्‍याच साधकांनी याचा लाभ करून घेऊन आत्मोन्नती (आध्यात्मिक उन्नती) करून घेतली आहे. साधकांमध्ये आत्मचैतन्याचे बळ वाढल्यामुळे ते निरनिराळ्या संकटांना निर्भयतेने … Read more

वासनाधीन असणा-यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असून ते त्यांच्या स्वार्थी वासनापूर्तीचे साधन असणे

‘वासनेचा ज्याला स्पर्श होत नाही, विकाराची सामग्री विनायास उपलब्ध असतांनाही, तो अविचल असतो, विकार ज्याच्या आसपासही भटकू शकत नाहीत, तोच (असे केवळ योगी वा संतच असू शकतात.) समाजाचे कल्याण करू शकतो. व्यक्ती आणि समाज यांना असेल तिथून वरच्या पायरीवर हमखास नेतोच नेतो. वासनाधीन असणार्‍यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असते. स्वतःच्या स्वार्थी वासनापूर्तीचे … Read more

सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करा !

‘आपल्यात अंतर्मुखता येण्यासाठी सेवा करण्यापूर्वी शरिरातील इंद्रियांना प्रार्थना करून त्यांची अनुमती घेऊन सेवा करावी आणि सेवा झाल्यानंतर प्रत्येक इंद्रियाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. इंद्रियांना गुलामाप्रमाणे वापरायला नको. सेवा करतांना अंतर्मुख होऊन आपल्यातील आत्मबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याचाच अर्थ प्रथम आपण स्वतः ‘आर्य’ व्हायचे (व्यष्टी साधना करायची) आणि सर्व समाजाला आर्य करण्यासाठी (समष्टी साधनेसाठी) प्रयत्न करायचा.’

कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती चैतन्यात असल्याने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय !

‘आपण दिवसभर भाव ठेवून कृती केल्यास आपल्यातील चैतन्यावर असलेले आवरण लवकर दूर होते. आपल्या शरिराभोवती चैतन्याचे आवरण निर्माण झाल्यामुळे बाह्य संकटांचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नाही. चैतन्याद्वारे आपण कोणत्याही संकटाला निर्भयतेने आणि सहजतेने सामोरे जाऊ शकतो. अशा रीतीने ‘स्वतःतील चैतन्याची वृद्धी करणे’, हेच जीवनाचे खरे ध्येय आहे. याद्वारेच आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटतो.’

पाश्चात्त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण

‘आज पाश्‍चात्त्य लोक लढाई न करता, आपल्या विचारांचा पगडा दुसर्‍या देशांवर लादत आहेत. दूरदर्शनच्या माध्यमाद्वारे विकारी आणि विलासी, क्रूरता वाढविणारे, हिंसक अन् अराजकता माजवणारे विचार पसरवत आहेत. दैवी विचारांचा लोप होत आहे. ते दुष्ट लोक स्वतः समृद्ध होण्यासाठी अणु बॉम्ब इत्यादी प्रलयकारी शस्त्रे बाळगून, दुसर्‍यांना शांतीच्या नावावर शस्त्रे बाळगण्यापासून परावृत्त करत आहेत. हिडीस नृत्य, बेसूर … Read more

कुठे काही वर्षांतच विसरले जाणारे मायेतील विषय, तर कुठे युगानुयुगे अभ्यासले जाणारे अध्यात्मातील ग्रंथ !

‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कोणाला ज्ञात नसतात. याउलट अध्यात्मातील इतिहास आणि ग्रंथ युगानुयुगे मानवाला ज्ञात असतात; कारण ते मार्गदर्शन करतात !’

परंपरांच्या विरोधात जाऊन समाजसुधारणा करणारे पुरोगामी आणि साम्यवादी पापाच्या पायावर उभे असणे

‘हे साम्यवादी आम्हा परपंरावाद्यांचा ‘जड, यांत्रिक आणि निर्जीव’ असा उपहास करतात. आम्हाला ‘कालप्रवाहाची उपेक्षा करणारे आहोत’, अशा शिव्याही हासडतात. खरे तर हे पुरोगामी, हे साम्यवादीच त्या अर्थाने परंपरावादी आहेत. स्वत:ला गोरगरिबांचे कैवारी म्हणवणारे वरकरणी कितीही समाजकल्याण आणि लोकहित यांच्या गोष्टी करू देत, योजना बनवू देत, ते सर्व पापाच्या पायावरच उभे आहेत.’

साधनेत शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचे कार्य

शरीर : ‘शरीर चांगले असले, तर साधना करता येते. ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी शरीर हेच प्रथम साधन आहे’, म्हणजेच ‘साधनेसाठी शरीर चांगले आवश्यक आहे.’ मन : मनाला साधनेचे महत्त्व कळले की, साधनेला आरंभ होतो. बुद्धी : बुद्धीला साधनेचे महत्त्व कळले की, साधना चांगली होते. चित्त : साधनेमुळे चित्तावरील संस्कार अल्प होऊ लागले की, … Read more

भगवंताप्रती श्रद्धा आणि भाव असण्याचे महत्त्व

आश्रमातील सर्व साधक संन्यासी आहेत. संन्यासी = सं + न्यासी. न्यास = नि + अस् = स्थापन करणे. ज्याचे जे स्थान आहे, त्या ठिकाणी त्याला स्थापन करणे. समेवर (समत्वाने) स्थिर रहाणारा समत्व स्थितीवर असलेला एखादा रोग झाल्याचे समजल्यावर ‘देव मृत्यूचे कारण सांगून घेऊन जात आहे’, या विषयी कृतज्ञता वाटायला हवी : आपल्याला एखादा रोग झाल्याचे … Read more

सर्वांमध्ये भगवंताचे रूप पाहून त्यांना नमस्कार करणारे परात्पर गुरु पांडे महाराज !

‘देवद आश्रमात एक हितचिंतक आले असतांना महाराजांनी त्यांना वाकून नमस्कार केला. एका साधिकेची भावस्थिती पाहून महाराजांनी त्यांनाही वाकून नमस्कार केला. ‘एका साधकाच्या घराच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला’, हे कळल्यावर महाराजांनी आनंदाने साधकाच्या पायाला हात लावून नमस्कार केला. ही सर्व उदाहरणे पाहिल्यावर ‘परात्पर गुरु पांडे महाराज वयोवृद्ध आणि तपोवृद्ध असूनही त्यांचा अहं किती अल्प आहे’, हे … Read more