परात्पर गुरु डॉ. आठवले हे सध्याच्या निधर्मी राजवट असलेल्या लोकशाहीतील अयोग्य कारभार उघड करत असून ही हिंदु राष्ट्र येण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची लक्षणे आहेत !

‘हे सर्व पहातांना वाटते की, जसे श्रीकृष्णाने पुतना आणि श्रीरामाने शूर्पणखा राक्षसींची खरी रूपे, म्हणजे मायावी रूपे उघड केली, तसे परात्पर गुरु डॉ. आठवले हे सध्याच्या निधर्मी राजवट असलेल्या लोकशाहीतील अयोग्य कारभार उघड करत आहेत. ही हिंदु राष्ट्र येण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याची लक्षणे आहेत.’

गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व

साधना करतांना गुरूंच्या आज्ञेने सर्व करत गेल्यास स्वतःचे मन आणि बुद्धी यांचा वापर न झाल्याने त्यांचा लय होतो. मनोलय आणि बुद्धीलय होतो. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत याला Disuse Atrophy (वापर न केल्यामुळे होणारा नाश) असे म्हणता येईल. यावरून गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व लक्षात येईल.

खरे अध्यात्म कळणे, म्हणजे काय ?

बर्‍याच जणांना आध्यात्मिक ग्रंथ वाचले किंवा कीर्तने वा अध्यात्मावरील प्रवचने ऐकली की, आपल्याला अध्यात्म कळले, असे वाटते. हे खरे अध्यात्म कळणे नव्हे; कारण हे केवळ शब्दांच्या पातळीला असते. अध्यात्मातील ज्ञान जेव्हा आपण जीवनात अनुभवू लागतो, तेव्हा अध्यात्माचा अर्थ आपल्याला खर्‍या अर्थाने कळायला लागतो. हे खरे अध्यात्म कळणे होय. खरे अध्यात्म कळण्यासाठी साधनाच करावी लागते.

आजच्या काळात ‘मोह’ आणि ‘लोभ’ यांनी अंध झालेल्या चोरांचे वाढत चाललेले माहात्म्य !

सर्वत्र चैतन्यच भरलेले असून तेच कार्य करते. सर्व सृष्टीच चैतन्याने भारित झालेली आहे. असे असतांना यामध्ये तुम्ही-आम्ही कुठून आलो ? एखाद्याने १० कोटी रुपये मिळवले आणि त्यातील १ लाख रुपये दान केले, तर त्याला दानशूर म्हणतात का ? यावरून आजच्या काळात ‘मोह’ आणि ‘लोभ’ यांनी अंध झालेल्या चोरांचे माहात्म्य वाढत असल्याचे दिसत आहे.

पापी लोकांनी गंगा इत्यादी सात्त्विक नद्यांत, जलाशयांत आणि समुद्रात स्नान केल्याने त्यांतील पाणी रज-तमप्रधान होणे, ते प्रदूषण स्थुलातील प्रदूषणापेक्षा अधिक हानीकारक असणे; पण भारतातील अनभिज्ञ सरकार त्यासंदर्भात काहीच करत नसणे !

‘पुंडलिक यात्रा करत असतांना त्याला काशीपासून ३ मैल अलीकडे कुक्कुट ऋषींचा आश्रम दिसला. तेथे त्याने मुक्काम केला. तेथे त्याला रात्रीच्या वेळी वर्णाने काळ्याकुट्ट असलेल्या आणि मलीन वस्त्रे परिधान केलेल्या ३ स्त्रिया ऋषींच्या आश्रमात येतांना दिसल्या. त्यांनी रात्रभर ऋषींची सेवा केली आणि सकाळी सडासंमार्जन करून त्या परत जाऊ लागल्या. हे पाहून पुंडलिकाने त्यांना नमस्कार करून विचारले, … Read more

हिंदु धर्मात धर्माचरणासाठी सण आणि व्रत-वैकल्ये करण्यास सांगितलेली असणे अन् त्यामुळे मनाची एकाग्रता होऊन योग्य धारणा निर्माण होणे

आपल्या हिंदु धर्मात धर्माचरणासाठी सण आणि व्रत-वैकल्ये करण्यास सांगितलेली आहेत. त्यामुळे मनाची एकाग्रता होते आणि योग्य धारणा निर्माण होते. त्यामुळे मानवाला पाप-पुण्याची चाड निर्माण होत असल्याने त्याच्या हातून पापाचरण होत नाही आणि म्हणूनच त्याला सत्य दर्शन होते.

साधना न केल्याने शासनकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी असणे; परंतु सध्याचे राजकारणी साधना करत नसल्याने त्यांच्या हातून सतत पापच घडत रहाणे ‘शेवटी माणूस त्याच्या स्वभावदोषाप्रमाणेच वागतो. स्वभावदोष-निर्मूलन करणे, म्हणजेच ‘साधना करणे’, हाच यावर उपाय आहे. पूर्वीच्या काळी राजेसुद्धा साधना करत असल्याने ते धर्माचरणी होते आणि त्याप्रमाणे ते राज्यकारभार करत होते. राजेसुद्धा संन्यास घेऊन साधनेसाठी अरण्यात … Read more

खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे !

‘ज्ञान’ हे पावित्र्य आणि मांगल्याचे जन्मस्थान आहे; म्हणूनच खर्‍या अर्थाने ज्ञानी, म्हणजेच विद्वान मनुष्याची किर्ती दूरवर पसरते. असे हे ज्ञान मनाच्याही पलीकडील निर्गुण अवस्थेत गेल्यानंतर जी अनुभूती येते, ते खरे ज्ञान ! खरे ज्ञान हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे ! आपण ‘आपल्याला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे’, असे म्हणतो, ती खरे म्हणजे त्या गोष्टीची … Read more

साधना न केल्याने राज्यकर्त्यांच्या हातून पापकर्म घडून लोकशाहीची दयनीय स्थिती होणे

‘१५.५.२०१८ या दिवशी कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. दैनिकातील वृत्तानुसार विरोधी पक्षातील आमदार फोडण्यासाठी पैसे देणे, यांना आमीष दाखवणे चालू होते. यातून ‘सर्व पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत’, हे सिद्ध होते. यावरून ‘केवळ सत्तेच्या लोभापोटी मनुष्य कसा वागतो आणि तो प्रत्यक्ष कसा असतो’, हे लक्षात येते.