‘व्यष्टी साधना करणार्या साधकाची साधना ‘माझी साधना कशी होईल ? माझी साधना होण्यासाठी मी अजून काय करू ?’, या प्रमुख विचारांच्या आधारे चालू असते. यामध्ये केवळ स्वतःच्याच साधनेचा विचार प्राधान्याने केला जातो. या विचारानुसार साधना करणार्या काही साधकांच्या विचारांचे रूपांतर पुढे स्वतःच्याच विचारांत गुरफटून ‘स्वार्थीपणा’मध्ये होण्याची शक्यता अधिक असते. याउलट समष्टी साधना करणार्या साधकाची साधना ‘इतरांची साधना कशी होईल ? इतरांना साधनेत साहाय्य कसे करू ?’ या विचारांच्या आधारे चालू असते. त्यामुळे यात त्याचे ‘मी’पण नष्ट होते; परिणामी ‘स्वार्थी’पणाही आपोआप नष्ट होतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
समष्टीचे मन जिंकणारा कुटुंबभाव !
नामहाकेला धावून येणारा भगवंत !
मंत्रांचे जसेच्या तसे ध्वनीमुद्रण करून त्यावर कोणत्याही इतर असात्त्विक नादाची प्रक्रिया न करणेच अधिक फलदायी...
कलियुगाला ‘संधिकाल’ का म्हटले आहे ?
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे