वेदनेचे लाभ !

‘वेदना झाल्या की, प्रत्येकालाच त्रास होतो आणि ‘त्या कधी थांबतील’, असे वाटते. प्रत्यक्षात वेदनेमुळे फार लाभही होतो. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. एखाद्याच्या पायाचा अस्थिभंग झाला असेल आणि ते विसरून तो चालायला लागला, तर त्याला पुष्कळ वेदना होतात. प्रत्यक्षात वेदना त्याला अस्थिभंगाची जाणीव करून देतात. त्यामुळे तो चालायचा थांबतो.

२. एखाद्याला जठरव्रण (अल्सर) झाला असेल आणि ‘त्याने खायचा नाही’, असा आंबट पदार्थ तो खायला लागला, तर त्याच्या पोटात पुष्कळ दुखते. तेव्हाही वेदना त्याला जठरव्रणाची (अल्सरची) जाणीव करून देतात. त्यामुळे तो आंबट पदार्थ खायचे थांबवतो.

अशा उदाहणांवरून लक्षात येते की, वेदनेमुळे त्रास होण्याप्रमाणे वेदना होऊ नये; म्हणून करावयाची कृती, घ्यायची औषधे इत्यादींची आठवण होते, म्हणजेच आपल्याला एक प्रकारे लाभच होतो. यावरून ‘देवाने घडवलेली प्रत्येक गोष्ट किती लाभदायक आहे’, हे लक्षात येते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment