एखाद्या प्रसंगातील कार्यकारणभाव जाणून घेण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधनेत पुढे जायला हवे !

बर्‍याच वेळा साधकांना त्यांच्या भावामुळे स्थुलातून आणि सूक्ष्म स्तरावर अनेक अनुभूती येत असतात. बरेच साधक संतांना याविषयी विचारतात, हे असे का घडले ? तसेच का घडले ? स्वप्नात मला जे दिसले, त्याचे कारण काय ? इत्यादी. या विचारांचा साधकांचे मन आणि त्यांची साधना यांवर परिणाम होतो. आरंभीच्या टप्प्याला एक जिज्ञासू म्हणून या अनुभूतींचे विश्‍लेषण आणि … Read more

अवतारी कार्यात धर्मग्लानी दूर करून सत्धर्म स्थापन करणे, हेच ध्येय असणे

धर्मग्लानी दूर करण्यासाठी अवतारी पुरुष जन्म घेतात. ते दृष्टांचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करतात. तेव्हा ते मायेतील संबंध बाजूला ठेवतात. जसे मामा असूनही कृष्णाने कंसाचा वध केला. कौरव-पांडव भाऊ असूनही कौरवांच्या दृष्ट वृत्तीमुळे पांडवांनी त्यांचा नाश केला. अगम्य कर्तृत्व त्या वेळी भारतात सर्वत्र मुसलमानी राज्य असूनही अगम्य क्षात्रतेज युक्त असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील पाच … Read more

राजदंडाचा अंकुश नसल्याने समाजाची स्थिती अराजकाची झाली आहे !

‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य आहे. जर राजदंडाने ते कार्य पार पाडले नाही, तर समाजात मात्स्य न्याय (मोठा मासा लहान माशाला गिळंकृत करतो.) माजेल.’

हे आदिशक्ति, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हाला बळ दे !

‘अफझलखानरूपी नराधमाला वधण्यासाठी जशी तू शिवछत्रपतींच्या तलवारीचे तेज बनलीस, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, धर्मांधता, जात्यंधता, गोहत्या आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात संघटित होण्यासाठी आम्हालाही तेज दे ! हिंदु धर्माची कीर्ती जगभर पसरवण्यासाठी जशी तू स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी राहिलीस, तसे हिंदु धर्म आणि साधना यांचा जगद्व्यापी प्रचार करण्यासाठी आमचीही स्वामिनी बन !! स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बालवयातच देशाच्या … Read more

कर्मनियंत्रणासाठी भगवंताशी सतत अनुसंधानित रहाण्याची आवश्यकता !

कर्म नियंत्रणात असेपर्यंत सुधारणा करणे शक्य असणे ‘एखादी गोष्ट आपल्या नियंत्रणात आहे, तोपर्यंत तिच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीतील सत्य-असत्य आणि परिणाम जाणून कृत्य केले पाहिजे, उदा. अन्न घशातून आत जाण्यापूर्वी त्यावर आपले नियंत्रण पाहिजे. एकदा ते पोटात गेले की, त्यावरील आपले नियंत्रण संपते. बोलण्याचेसुद्धा असेच आहे. आपल्या मुखातून बोल निघेपर्यंत विचार करूनच बोलले पाहिजे. … Read more

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना श्रद्धा आणि सबुरी हवी !

काही जणांमध्ये मनाने करणे, अव्यवस्थितपणा, अनावश्यक बोलणे, अकारण मोठ्या आवाजात बोलणे यांसारखे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रबळ असतात. ते त्यांच्या प्रकृतीत इतके मुरलेेले असतात की, त्यांना त्यांची जाणीवही नसते आणि म्हणून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून त्यांवर मात करणे त्यांना इतरांच्या तुलनेत कठीण जाते. यामुळे त्यांना निराशा येते किंवा प्रक्रिया राबवणेच नको वाटते. … Read more

अखिल मानवजातीसाठी चिरंतन संजीवनी !

‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ ही केवळ साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीला भवरोगातून मुक्त करणारी चिरंतन संजीवनी आहे.’