श्राद्ध नाही, तर वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग !

वृद्ध आई-वडिलांची, आजोबा-आजींची काळजी न घेता, ते गेल्यावर श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध करणार्‍यांना विधींचा कितपत लाभ होणार ? पूर्वजांचा त्रास होतो; म्हणून नारायण-नागबळी सारखे विधी करणे केवळ स्वार्थी होेत. वडिलधार्‍यांची सेवा करणे, हाच पितृऋणातून मुक्त व्हायचा खरा मार्ग आहे. वडिलधार्‍यांची सेवा करणे हे कर्तव्यच आहे. त्याचे पालन केले, तर पुण्य लाभत नाही, पण न केल्यास दोष … Read more

आई-वडिलांविषयी कृतज्ञता वाटली पाहिजे !

कोणी थोडेफार साहाय्य केले,तरी त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते.आई-वडिलांनी तर जन्म दिला आणि आपल्याला लहानाचे मोठे केले;म्हणून त्यांच्याबद्दल किती कृतज्ञता वाटली पाहिजे !आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची शेवटपर्यंत काळजी घेणे,हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. – (प.पू.) डॉ.आठवले (२९.७.२०१४)

मोडकळीस येत असलेली कुटुंबव्यवस्था

हल्ली एकत्र कुटुंब हा शब्द भूतकाळातील आणि अशक्य असा वाटतो. पूर्वीच्या एकत्र कुटुंबात केवळ सख्खीच नाही, तर चुलत भावंडेही एकत्र रहात. काही एकत्र कुटुंबांत ४० – ५० व्यक्तीही असत. बर्‍याच कुटुंबांतील वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात येत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. काही वर्षांनी तर कुटुंब हा शब्दही उरणार नाही कि काय ?, अशी स्थिती निर्माण … Read more

पातळीनुसार भक्तीमार्गातील साधनेचे पुढचे पुढचे टप्पे

हल्ली बहुसंख्य व्यक्ती साधना करत नाहीत. साधना करणार्‍या बहुतेकांना साधनेत पातळीनुसार पालट होत जातो, हे ज्ञात नसते. त्यामुळे ते आयुष्यभर तीच साधना करत रहातात. कोणत्याही योगमार्गाने साधना करत असले, तरी असेच होत असल्याचे लक्षात येते. येथे भक्तीयोगाचे उदाहरण दिले आहे. भक्तीयोगातील प्रगतीनुसार साधनेतील टप्पे : साधनेचा प्रकार आणि स्तर अनुभव आणि अनुभूती साधकाची आध्यात्मिक पातळी … Read more

अध्यात्मातील ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तर लिखाण

ज्ञानपूर्व लिखाण ज्ञानोत्तर लिखाण १. लेखक सर्वसाधारण व्यक्ती संत २. स्तर बुद्धीचा बुद्धीपलीकडील ३. लिखाणाचा उगम ग्रंथांचा अभ्यास आणि चिंतन अंतःस्फूर्ती (विश्‍वबुद्धीकडून प्राप्त होणारे ज्ञान) ४. चैतन्याचे प्रमाण (टक्के) ० – २ लेखकाच्या आध्यात्मिक स्तरानुसार ५० – ७० ५. लिखाण टिकण्याचा अवधी ५ – ३० वर्षे शेकडो ते हजारो वर्षे – (प.पू.) डॉ. आठवले (२४.११.२०१४)

अधोगतीला नेणारे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, उच्छृंखलपणा !

शाळेतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कसेही वागायला कोणी संमती देत नाही. गुन्हेगारांना गुन्हे करायला, रस्त्यावरून गाडी कशीही चालवायला व्यक्तीस्वातंत्र्य नसते. वैद्य नसलेल्याला औषधे द्यायला संमती नसते. याचा अर्थ हा की, समाजातील सर्वच क्षेत्रांत व्यक्तीस्वातंत्र्याला संमती नसते. असे असतांना व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात स्वेच्छेने कसेही वागायला संमती मागतांना कोणाला काहीच कसे वाटत नाही ? १. स्वेच्छेने, … Read more

युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे

२५ वर्षे संमोहन उपचारतज्ञ म्हणून अनेक पती-पत्नींवर त्यांचे आपसात पटत नाही; म्हणून महिनोन्महिने उपाय केले, तरी त्यांचे फारसे जुळत नाही, हे लक्षात आले. याची दोन प्रमुख कारणे आहेत साधनेचा अभाव आणि कालमाहात्म्य. युगानुसार पती-पत्नीचे एकमेकांशी पटणे युग पती-पत्नीचे एकमेकांशी पटण्याचे प्रमाण (टक्के) १. सत्ययुग १०० २. त्रेतायुग ७५ ३. द्वापरयुग ५० ४. कलियुग २५ ४ … Read more

जशी वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते, तसेच सर्व स्थानदेवता, ग्रामदेवता इत्यादी देवतांचे असते !

जिथे आपल्या देहावरच आपला ताबा नसतो, तेथे आपल्या वस्तू, वास्तू इत्यादींना आपले म्हणायचा आपल्याला काय अधिकार ? आपण ज्या वास्तूत रहातो, ती वास्तू आपल्याला आपली वाटते; पण ती वास्तू आपली नसून वास्तूदेवतेची असते; कारण त्या जागी आपण पुढे असू किंवा नसू, तरी देवता मात्र तेथेच असते. राजकारण्यांनाही वाटते, हा मतदारसंघ माझा. हे गाव माझे. हे … Read more

बुद्धीप्रामाण्यवादी आणि प.पू. डॉक्टर यांच्या दृष्टीकोनांतील मूलभूत भेद म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसणे आणि प.पू. डॉक्टरांना जिज्ञासा असणे

बरेच ज्योतिषी माझा मृत्यूयोग जवळ आल्याचे गेली १० वर्षे सांगत आहेत. काही ज्योतिषांना मी जिवंत आहे, हे पाहून आश्‍चर्य वाटते. हे ऐकल्यावर बुद्धीप्रामाण्यवादी म्हणतील, बघा. आम्ही म्हणतो ना, ज्योतिषशास्त्र खोटे आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले ! याउलट माझ्या मनात विचार येतो, माझा मृत्यूयोग असूनही मी गेली १० वर्षे जिवंत असण्याचे कारण काय ? जिज्ञासेमुळे … Read more

असे संत हिंदूंपुढे आचारधर्माचा आदर्श काय ठेवणार ?

संत एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून करत आहेत, असे बर्‍याचदा पहायला मिळते. विविध संप्रदायांच्या नियतकालिकांतही तसे दर्शविणारी छायाचित्रे असतात. पाश्‍चात्त्यांप्रमाणे फीत कापून उद्घाटन केल्यामुळे दर्शनार्थी हिंदूंवर आपण अयोग्य संस्कार करत आहोत, याचेही त्यांना भान नसते ! – (प.पू) डॉ. आठवले (२०.११.२०१४)