तन, मन आणि धन यांच्या त्यागांपैकी धनाचा त्याग करणे सर्वांत कमी कष्टदायक !

याचे कारण हे की, त्यात आपल्याकडचे पैसे किंवा कागदावर सही करून ते कागद द्यायचे असतात. याला विशेष श्रम करावे लागत नाहीत. याउलट तनाचा त्याग करण्यासाठी वर्षानुवर्षे सेवा करावी लागते आणि मनाचा त्याग करण्यासाठी नामजप करणे, तसेच स्वभावदोष निर्मूलनासाठीच्या स्वयंसूचना देणे, हेही वर्षानुवर्षे करावे लागते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर…

आग लागू नये याची काळजी न घेता आग सर्वत्र लागल्यावर पाणी शिंपडणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच साधना न शिकवता विविध माध्यमांतून भ्रष्टाचार, गुंडगिरी, अनैतिकता इत्यादी पसरू द्यायचे आणि नंतर काहीतरी केले, असे दाखवायचे, ही आहे विविध राज्यकर्त्या पक्षांची कार्यपद्धत ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदूद्रोह्यांनो, सत्यमेव जयते हे लक्षात ठेवा !

असत्याच्या पायावर कोणताही अन्याय, अविवेक अथवा काहीही टिकू शकत नाही. भलेही त्यामागे सत्ता, संपत्तीचे बळ असो ! काळ हाच सत्याचा संस्थापक आहे आणि असत्याचा विनाशक आहे. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २०१५)

दिसेल ते कर्तव्य, भोगीन ते प्रारब्ध आणि घडेल ते कर्म.

भावार्थ : व्यवहारातील कर्म हे कर्तव्य म्हणून केले पाहिजे. त्यातील मायेत गुरफटले जाता कामा नये. ज्याच्या त्याच्या भाग्याने जे व्हायचे, तेच होते; परंतु मायेत न पडता व्यवहाराप्रमाणे आपापली पुढे येणारी कर्मे कर्तव्य म्हणून केली पाहिजेत. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

साधनेच्या संदर्भात तन-मन-धनाच्या त्यागांपैकी धनाचा त्याग सर्वांत कनिष्ठ !

धनाचा त्याग त्याग करणे बहुतेकांना कठीण वाटते; कारण आपली भविष्यकाळातील काळजी धनच घेईल, असे त्यांना वाटते. साधनेच्या संदर्भात तन-मन-धनाच्या त्यागांपैकी धनाचा त्याग सर्वांत कनिष्ठ आहे; कारण त्याच्यामुळे स्वभावदोष निर्मूलन होत नाही, म्हणजेच मनाचा त्याग होत नाही. उलट धनाचा त्याग केल्यामुळे अहं वाढतो. त्यामुळे तनाचा त्याग करणे, म्हणजे सेवा करणे, हेही अशक्य होते. यासंदर्भातील एक अनुभव … Read more

युगांनुसार व्यष्टी अन् समष्टी साधनेचे प्रमाण आणि कलियुगात समष्टी साधनेचे महत्त्व

साधनेचा प्रकार सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग १. व्यष्टी साधनेचे प्रमाण (टक्के) १०० ७० ५० ३० २. समष्टी साधनेचे प्रमाण (टक्के) ० ३० ५० ७० एकूण १०० १०० १०० १०० सत्ययुगात प्रत्येक जण साधना करणारा असल्यामुळे समष्टी साधनेची, म्हणजे समाजात जाऊन साधनेचे महत्त्व सांगणे, साधना करवून घेणे इत्यादींची आवश्यकता नव्हती. पुढे त्रेतायुग आणि द्वापरयुग यांत व्यष्टी … Read more

भगवंताच्या अनुसंधानाचे महत्त्व !

घरात सर्व विद्युत जोडणी केली; मात्र पंखा चालू करण्यासाठी कळ दाबली नाही, तर पंखा चालू होणार नाही. तद्वतच सेवा केली; मात्र भगवंताशी अनुसंधानच ठेवले नाही, तर सेवेचा लाभ मिळणार नाही. ही कळ म्हणजे नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता. त्यांचा उपयोग करावा. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.८.२०१४)

सजीव-निर्जीव प्रत्येकात भगवंताला शोधणे

प्रत्येकाच्या मुळाचा शोध घेतला असता भगवंताचे अस्तित्व लक्षात येते, उदा. हात-तोंड पुसण्यासाठी वापरण्यात येणार्‍या रुमालाचे मूळ कापूस आहे, कापसाचे मूळ झाड आहे, झाडाचे मूळ बी आहे आणि या बीचे मूळ भगवंत आहे. रुमालातील भगवंत आपल्यातील भगवंताचे तोंड पुसतो, म्हणजे त्याची सेवा करतो. लेखणीतील भगवंत लिखाणाची सेवा करतो, अशा प्रकारे विचारप्रक्रिया ठेवल्यास आपले अस्तित्वच नष्ट होते. … Read more

साधना

वेद म्हणतात, तो (भगवंत) बृहद् झाला आहे. भगवंत विविध रूपांतून प्रकट होतो. माझ्या साहाय्यासाठी सर्व वस्तू आणि प्राणी आहेत. पहाण्याची दृष्टी पालटली पाहिजे. भगवंत माझ्यामधून कार्य करतो. माझी स्तुती ही भगवंताची स्तुती आहे; म्हणून त्याची बदनामी होऊ नये, असे वागणे म्हणजे साधना होय. – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.८.२०१४)

आत्मज्ञान

जे अज्ञात आहे, म्हणजे सध्या ज्ञात नाही, आठवत नाही, असे आत्मज्ञान सत्संग, सेवा यांद्वारे तात्पुरते आवरण निघाल्यामुळे (तात्पुरते) प्राप्त झाल्यासारखे वाटते. हे आवरण कायमस्वरूपी काढण्याचा प्रयत्न येथे (आश्रमात) चालू आहे, उदा. संगणकाच्या हार्ड-डिस्कमध्ये माहिती आहे; मात्र ती त्याविषयी माहिती नसणार्‍याला अज्ञात आहे. जेव्हा आपण योग्य कळ दाबतो, आज्ञा देतो, तेव्हा ती प्रकट होते, दृश्य स्वरूपात … Read more