दिलेली सेवा मनापासून, भावपूर्ण, झोकून देऊन केली, तर ती गुरूंच्या चरणी समर्पित होणार आहे !

कोणतीही सेवा अशी करायची की, ‘ती देवाला आवडली पाहिजे’. सेवा झाल्यावर स्वत:ला एकच प्रश्न विचारायचा, ‘देवा, तुला ही सेवा आवडली का ?’ त्यावर आतून देव जसे उत्तर देईल, त्यानुसार पुढे कृती करत रहायचे. जेव्हा ‘मी केलेली सेवा देवाला आवडायला हवी’, असा विचार असतो, तेव्हा आपल्याकडून ‘आळस करणे, सवलत घेणे’, असे होत नाही. दिलेली सेवा मनापासून, भावपूर्ण आणि झोकून देऊन केली, तर गुरूंच्या चरणी का नाही समर्पित होणार ? प्रत्येक सेवा ईश्वराच्या जवळ जाण्याचे एक माध्यम आहे. सेवेच्या माध्यमातून ईश्वराचे गुण आपल्यात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

Leave a Comment