साधनेतील तळमळीचे महत्त्व

अ. गुरुकृपेने साधनेचे क्रियमाण वापरून प्रारब्धावरही मात करू शकतो ! : आपले गुरु एवढे महान आहेत की, ते प्रत्येक साधकाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारच आहेत. ते प्रत्येकाला मोक्षाला घेऊन जाणारच आहेत. गुरूंवर अपार श्रद्धा ठेवून आपण साधनेचे क्रियमाण वापरूया. साधनेचे योग्य क्रियमाण वापरल्यास गुरुकृपेने आपण प्रारब्धावरही मात करू शकतो.

आ. परिस्थिती अनुकूल कि प्रतिकूल हे क्रियमाणावर अवलंबून ! : ‘सध्याचा काळ हा प्रतिकूल आहे; मात्र साधनेसाठी अनुकूल आहे. आपल्या क्रियमाणावर परिस्थिती अनुकूल कि प्रतिकूल, हे ठरत असते.

इ. मनात तळमळ असली की, साधना होते. प्रगती करण्यासाठी साधकाचे वय, लिंग (पुरुष / स्त्री), शिक्षण, सेवा यांपैकी कशाचीही मर्यादा येत नाही.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

Leave a Comment