आपत्काळ वेगाने येत असल्याने व्यष्टी साधना वाढवा !

आपत्काळ वेगाने येत आहे. प.पू. गुरुदेव नेहमीच सांगतात, ‘‘पाणी नाकापर्यंत आले आहे. त्यानंतर संधीच मिळणार नाही.’’ यासाठी व्यष्टी साधना आताच वाढवली पाहिजे. आपल्याला केवळ माध्यम बनायचे आहे आणि बाकी सर्व गुरुच करून घेणार आहेत. माध्यम बनण्यासाठी मन आणि बुद्धी या सर्वांची शुद्धी झाली पाहिजे.

साधनेचा स्तर वाढल्यावर आपण परेच्छेने वागायला लागतो. साधकांमध्ये क्षमता आहे; म्हणून प.पू. गुरुदेवांनी आपल्याला साधनेचे प्रयत्न करायला सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याकडून प्रयत्न होणार नाहीत, असे कधीच नसते. अल्पसंतुष्ट न रहाता सतत पुढे जाता आले पाहिजे.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

Leave a Comment