‘देवाने माझ्यावर सेवेचे दायित्व दिले आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडून सेवा होत आहे ना ? मी देवाला अपेक्षित अशी सेवा करत आहे ना ? ‘सेवेतून पूर्ण फलनिष्पत्ती मिळून सेवेच्या माध्यमातून साधनेचे ध्येय गाठणे’, या अनुषंगाने माझी सेवा चालू आहे ना ? ‘ही सेवा मला गुरूंच्या कृपेने मिळाली आहे’, याची सतत जाणीव ठेवून मी सेवेतून आनंद मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे ना ? सेवेच्या दायित्वाचे गांभीर्य लक्षात ठेवून मी सेवा परिपूर्ण होण्यासाठी तळमळीने प्रयत्नशील आहे ना ?’, इत्यादी प्रश्न मनाला विचारत राहिले की, सेवेप्रती गांभीर्य वाढून आपल्याला आपल्या दायित्वाची जाणीव होऊ लागते.
‘साधकाची सेवा परिपूर्ण होऊन त्यातून त्याची साधनाही व्हावी’, याचे खरे दायित्व आपल्या गुरूंनीच घेतलेले असते. साधकांनी सेवा करण्यामागे गुरूंच्या संकल्पशक्तीचे बळ कार्यरत असते. यामुळे गुरुचरणांना स्मरून तन्मयतेने सेवा केली की, साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढते.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तिरुवण्णमलई, तमिळनाडू. (१८.४.२०२०)
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.