१०.५.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी माझ्या संदर्भात सप्तर्षी जीवनाडीपट्टीचे वाचन केले. तेव्हा त्यांनी पुढे हिंदु राष्ट्र होणार आहे, असे सांगितले. यासंदर्भात काही जणांच्या मनात प्रश्न आला, हिंदु राष्ट्र होणारच आहे, तर आपण प्रयत्न कशाला करायचे ?, याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे,
श्रीकृष्णाने जेव्हा केवळ उजव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोप-गोपींनी पर्वताला खालून काठ्या लावल्या. तेव्हा ते कृष्णाला साहाय्य करत नव्हते, तर स्वतःची साधना करत होते. त्याचप्रमाणे आपण प्रयत्न केले नाहीत, तरी हिंदु राष्ट्र होणारच आहे. आपण प्रयत्न करायचे, ते आपली साधना म्हणून, आपली उन्नती व्हावी म्हणून.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आत्मशक्ती आणि चैतन्याचे सामर्थ्य
साधना ही सर्व बंधनापलीकडे आहे
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !