गुरुकृपायोगाद्वारे साधना करून स्वतःमध्ये पालट घडवून आणा आणि गुरुकृपेने येणार्‍या कोणत्याही कठीण परिस्थितीला सामर्थ्याने सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !

दैनिक सनातन प्रभातच्या वाचकांसाठी प.पू. पांडे महाराज यांचा संदेश !

दैनिक सनातन प्रभातच्या आदरणीय वाचकांना,

सप्रेम नमस्कार.

मानवाच्या हातून भूतकाळात घडलेल्या वाईट कर्मांचा परिणाम, म्हणजे आजची भयानक वर्तमान स्थिती आहे, जी आपण प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातमधून वाचत आहोत.

भारतीय संस्कृती आणि संत-महात्मे यांनी मानवाला भौतिक अन् पारमार्थिक दृष्टीने समर्थ होण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे आजचा मानव वागत नसल्याने त्याच्या अशा दुराचाराचे दुष्परिणाम वातावरणावर होऊन पुढे प्रत्यक्ष उत्पात होणार असल्याचे दिसते. तेव्हा याचा विचार करून मनाची धारणा सत्त्वगुणी होण्यासाठी गुरुकृपायोगाद्वारे साधना करून सदाचाराने आचरण केल्यास स्वतःमध्ये पालट होईल, तसेच गुरुकृपेने येणार्‍या कोणत्याही कठीण परिस्थितीला सामर्थ्याने सामोरे जाता येईल.

– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

Leave a Comment