‘आपल्या भारतामध्ये नदी, पर्वत, भूमी असे जे वातावरण आहे, ते सात्त्विकतेने, अध्यात्माने प्रभावित आहे, चैतन्याने युक्त आहे. त्याला नाहिसे करण्याचे आपणच ठरवलेले आहे, म्हणजे स्वतःचा आत्मघात करत आहोत. आपल्या देशातील नद्या या केवळ नद्या नाहीत. नदी म्हणजे चैतन्यरूपात कार्य करणारी प्रभुशक्ती आहे. हिमालय केवळ पर्वत नाही, तर ती देवाची शक्ती आहे.’
– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.४.२०१५)
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !
भक्ताच्या निर्विचार अवस्थेत देव त्याचा विचार करतो.