गुरूंचे एखाद्या व्यक्तीविषयीचे बोल त्याच्या अंतर्मनात चालू असणार्‍या ईश्वरप्राप्तीच्या तळमळीला उद्देशून असतात !

गुरु नेहमीच एखाद्या प्रकृतीकडे पहातांना त्याच्या बाह्य वैगुण्याकडे पहात नाहीत, तर त्या व्यक्तीत असणार्‍या ईश्वरप्राप्तीच्या धडपडीकडे त्यांचे लक्ष असते. गुरूंचे त्या व्यक्तीविषयीचे बोल, हे नेहमी त्याच्या अंतर्मनात चालू असणार्‍या ईश्वरप्राप्तीच्या तळमळीला उद्देशून असतात. तेव्हा गुरूंच्या त्या व्यक्तीविषयींच्या बोलांचा अर्थ समजून घेतल्यास आपल्या मनात गुरूंविषयी विकल्प येत नाहीत.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment