काळाचे गणित सर्वस्वी निराळे असल्याने बुद्धीने काळाला तपासून पहाण्याचा प्रयत्न न करता केवळ गुर्वाज्ञापालन करावे

‘काळाला अनुसरून काय करायचे ?’, हे केवळ गुरूंनाच ज्ञात असते; म्हणून आपण केवळ गुर्वाज्ञापालन करावे. बुद्धीने काळाला तपासून पहाण्याचा प्रयत्न करू नये; कारण काळाचे गणित सर्वस्वी निराळे असते. ते भल्याभल्यांना आपल्या प्रवाहात ओढून घेते. विचित्र काळगतीच्या प्रवाहातून गुरुच आपल्याला वाचवतात आणि आपल्याला गुरुगतीत सामावून घेतात, म्हणजेच त्यांच्या सत्संगात ठेवतात.

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

Leave a Comment