‘भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगणे, ‘ते कसे घ्यायचे ?’, हे शिकवणे’, हेच खरे शिक्षण आहे. मृत्यूनंतर डोक्यातील ‘गणित आणि विज्ञान’ या सर्व जडातील विषयांची राखरांगोळी होते. केवळ शाश्वत असणारे देवाचे नामच त्या जिवाच्या समवेत जाते. शाळेतील गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तम गुरु हा जीवनातील खरा मार्गदर्शक आहे. ‘गुरूंचे महत्त्व जे शाळा शिकवत नाही, ती शाळा आणि ते शिक्षण काय कामाचे ?’, अशा जडातील निरर्थक शिक्षणाने लोकांचे अनेक जन्म वाया जातात. खरी शाळा ही मोक्षप्राप्ती करून देणारी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये शाळेला मंदिराचा दर्जा दिला आहे. शाळेला ‘शिक्षण मंदिर’, असे संबोधले जाते. आजच्या समाजाला मोक्षप्राप्ती करून देणार्या शिक्षण मंदिरांची नितांत आवश्यकता आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
आत्मशक्तीचे सामर्थ्य !
खरा साधक कसा हवा ?
देवाप्रतीच्या भावामुळे साधकाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहाता येते !
साधकाने परिस्थितीला गुरु मानून तिच्याकडून शिकत राहिल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याला आनंद मिळतो !
समष्टी साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व !
खरा अभ्यास !